शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

वहीपासून तयार केली लग्नपत्रिका; संपूर्ण परिसरात तिचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:42 IST

वहीचा केला वापर; नागरिकांकडून स्वागत

अंबरनाथ : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका येतात. मात्र, लग्न झाल्यावर पत्रिका रद्दीमध्ये जातात. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ही रद्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी अंबरनाथमधील एका कुटुंबाने चांगला प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका ही वहीच्या मुखपृष्ठावर छापण्याचा. त्या वहीचा किमान वापर होईल, या हेतूने त्या कुटुंबाने सर्व पत्रिका वहीवर छापल्या आहेत. त्यामुळे सध्या या लग्नपत्रिकेची चर्चा शहरभर रंगली आहे.अंबरनाथमधील गिरीश आणि मनीषा त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा विवाह जानेवारी महिन्यात होणार आहे. या विवाहासाठी त्यांनी जी पत्रिका छापली आहे, ती पत्रिका आणि तिच्या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. पत्रिका वाया जात असल्याने त्रिवेदी कुटुंबीयांनी वहीच्या मुखपृष्ठावर निमंत्रणपत्रिका छापली आहे. पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. ज्या कुणाला निमंत्रण द्यायचे आहे, त्यांना थेट वही दिली जात आहे. त्यामुळे हे निमंत्रण प्रत्येकजण कुतूहलाने पाहत आहे. २०० पानी वही हातात येत असल्याने ती वही चाळल्याशिवाय किंवा मागेपुढे बघितल्याशिवाय कुणीच पत्रिका बाजूला ठेवत नाही.विशेष म्हणजे या निमंत्रणपत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आईवडिलांचेही नाव छापले आहे. शक्यतो पत्नीच्या आईवडिलांचे नाव लग्नपत्रिकेत टाकले जात नाही. मात्र, त्रिवेदी यांनी पत्नीच्या आईवडिलांचे नाव टाकून त्यांनाही योग्य मान दिला आहे.दरम्यान, लग्नासाठी नेहमीच महागड्या पत्रिका छापून घेतल्या जातात. त्यातून काहींना आपल्या श्रीमंतीचे दर्शनही घडवायचे असते. मात्र त्रिवेदी कुटुंबाने पाडलेल्या या पायंड्याने अशा मंडळींच्या डोळ््यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यांचा आदर्श ठेवावा असा सूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.तब्बल एक हजार पत्रिका छापण्यात आल्या असून त्यातील ज्या पत्रिका उरतील, त्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची एकही पत्रिका वाया जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली आहे. हा प्रयोग इतरांनीही राबविला तर अनेक वह्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे शक्य होईल.- गिरीश त्रिवेदी, वरपिता