शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वहीपासून तयार केली लग्नपत्रिका; संपूर्ण परिसरात तिचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:42 IST

वहीचा केला वापर; नागरिकांकडून स्वागत

अंबरनाथ : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका येतात. मात्र, लग्न झाल्यावर पत्रिका रद्दीमध्ये जातात. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ही रद्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी अंबरनाथमधील एका कुटुंबाने चांगला प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका ही वहीच्या मुखपृष्ठावर छापण्याचा. त्या वहीचा किमान वापर होईल, या हेतूने त्या कुटुंबाने सर्व पत्रिका वहीवर छापल्या आहेत. त्यामुळे सध्या या लग्नपत्रिकेची चर्चा शहरभर रंगली आहे.अंबरनाथमधील गिरीश आणि मनीषा त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा विवाह जानेवारी महिन्यात होणार आहे. या विवाहासाठी त्यांनी जी पत्रिका छापली आहे, ती पत्रिका आणि तिच्या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. पत्रिका वाया जात असल्याने त्रिवेदी कुटुंबीयांनी वहीच्या मुखपृष्ठावर निमंत्रणपत्रिका छापली आहे. पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. ज्या कुणाला निमंत्रण द्यायचे आहे, त्यांना थेट वही दिली जात आहे. त्यामुळे हे निमंत्रण प्रत्येकजण कुतूहलाने पाहत आहे. २०० पानी वही हातात येत असल्याने ती वही चाळल्याशिवाय किंवा मागेपुढे बघितल्याशिवाय कुणीच पत्रिका बाजूला ठेवत नाही.विशेष म्हणजे या निमंत्रणपत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आईवडिलांचेही नाव छापले आहे. शक्यतो पत्नीच्या आईवडिलांचे नाव लग्नपत्रिकेत टाकले जात नाही. मात्र, त्रिवेदी यांनी पत्नीच्या आईवडिलांचे नाव टाकून त्यांनाही योग्य मान दिला आहे.दरम्यान, लग्नासाठी नेहमीच महागड्या पत्रिका छापून घेतल्या जातात. त्यातून काहींना आपल्या श्रीमंतीचे दर्शनही घडवायचे असते. मात्र त्रिवेदी कुटुंबाने पाडलेल्या या पायंड्याने अशा मंडळींच्या डोळ््यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यांचा आदर्श ठेवावा असा सूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.तब्बल एक हजार पत्रिका छापण्यात आल्या असून त्यातील ज्या पत्रिका उरतील, त्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची एकही पत्रिका वाया जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली आहे. हा प्रयोग इतरांनीही राबविला तर अनेक वह्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे शक्य होईल.- गिरीश त्रिवेदी, वरपिता