शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:09 IST

पालकमंत्र्यांचा निर्धार; कपिल पाटील यांचा भिवंडीत सत्कार

भिवंडी : लोकसभेच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील चारही जागा जिंकून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इतिहास घडविला. आता तोच कल कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवू, असा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी येथे व्यक्त केला.तालुक्यातील वळ येथे खासदार कपिल पाटील यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार गणपत गायकवाड, रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, नरेंद्र पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, विश्वास थळे, महेंद्र गायकवाड, मदनबुवा नाईक, देवानंद थळे, संतोष शेट्टी, दयानंद चोरघे आदी उपस्थित होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीने एकत्र लढवाव्यात. त्यातून कार्यकर्त्यांमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या मोठ्या कुटुंबात मतभेद होतात. पण काही काळानंतर सर्व एकत्र येतात. त्याच धर्तीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे कार्य केले. आता खासदार पाटील यांची जबाबदारी वाढली असून, तीन खासदारांनी एकत्र येऊन केंद्रातील विविध प्रकल्प राबवून विकास करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.भिवंडीतील दोन मतदारसंघात महायुतीला मिळालेली मतांची पिछाडी भरून काढण्यासाठी एक दिलाने काम करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. कल्याण-मुरबाड रेल्वे, कल्याण-मुरबाड रस्ता आणि माळशेज घाटात बोगदा आदी कामे सुरू करण्याचा प्रयत्न आहे.कार्यकर्त्यांचे सर्जिकल स्ट्राइकलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवर खोटे मेसेज व्हायरल केले जात होते. मतदानाच्या दिवशीही थेट जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नावाने मेसेज व्हायरल झाला होता. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राइक करून विजय मिळवून दिला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना