शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

...तर टोलनाका कायमचा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:39 IST

मुझफ्फर हुसेन यांची सरकारवर टीका। टोलनाक्याआड वसुली सुरू असल्याचा आरोप

मीरा रोड : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी दहिसर टोलनाका बंद करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने दिले होते. अगदी आंदोलनाची नौटंकीही केली होती. पण, हा टोलनाका आजही कायम असल्याची टीकेची झोड काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी उठवली आहे. आपण निवडून आल्यावर दहिसरचा टोलनाका कायमचा बंद करून या जाचातून नागरिकांची सुटका करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन मुझफ्फर हुसेन यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिले.

मीरा-भार्इंदर शहराला लागूनच असलेल्या मुंबई शहरात येजा करण्यासाठी मीरा-भार्इंदरकरांना दहिसर टोलनाक्यावर टोलचा भुर्दंड सहन करावा लागतो. युतीचे सरकार असतानाच मुंबईतील उड्डाणपूल बांधण्याच्या आड या टोलनाक्यांचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसवण्यात आले. आज मुंबईतील रस्ते व उड्डाणपुलांची खड्डे आणि वाहतूककोंडीने दुरवस्था झालेली असताना टोलवसुली मात्र नागरिकांकडून सुरूच असल्याची टीका मुझफ्फर यांनी केली.

गत विधानसभा निवडणुकीवेळी युतीने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्वच टोलनाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजतागायत मुंबई प्रवेशद्वारावरील एकही टोलनाका युतीने बंद केला नसल्याकडे मुझफ्फर यांनी यावेळी लक्ष वेधले. मुळात भाजप-शिवसेनेची टोलनाका बंद करण्याची मानसिकताच नाही. त्यांना टोलनाक्यांआड नागरिकांची लूट करण्यातच स्वारस्य असून, आपण निवडून आल्यावर टोलनाका कायमचा बंद केल्याशिवाय राहणार नाही, असे मुझफ्फर म्हणाले.