शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

...तर टोलनाका कायमचा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:39 IST

मुझफ्फर हुसेन यांची सरकारवर टीका। टोलनाक्याआड वसुली सुरू असल्याचा आरोप

मीरा रोड : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी दहिसर टोलनाका बंद करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने दिले होते. अगदी आंदोलनाची नौटंकीही केली होती. पण, हा टोलनाका आजही कायम असल्याची टीकेची झोड काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी उठवली आहे. आपण निवडून आल्यावर दहिसरचा टोलनाका कायमचा बंद करून या जाचातून नागरिकांची सुटका करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन मुझफ्फर हुसेन यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिले.

मीरा-भार्इंदर शहराला लागूनच असलेल्या मुंबई शहरात येजा करण्यासाठी मीरा-भार्इंदरकरांना दहिसर टोलनाक्यावर टोलचा भुर्दंड सहन करावा लागतो. युतीचे सरकार असतानाच मुंबईतील उड्डाणपूल बांधण्याच्या आड या टोलनाक्यांचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसवण्यात आले. आज मुंबईतील रस्ते व उड्डाणपुलांची खड्डे आणि वाहतूककोंडीने दुरवस्था झालेली असताना टोलवसुली मात्र नागरिकांकडून सुरूच असल्याची टीका मुझफ्फर यांनी केली.

गत विधानसभा निवडणुकीवेळी युतीने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्वच टोलनाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजतागायत मुंबई प्रवेशद्वारावरील एकही टोलनाका युतीने बंद केला नसल्याकडे मुझफ्फर यांनी यावेळी लक्ष वेधले. मुळात भाजप-शिवसेनेची टोलनाका बंद करण्याची मानसिकताच नाही. त्यांना टोलनाक्यांआड नागरिकांची लूट करण्यातच स्वारस्य असून, आपण निवडून आल्यावर टोलनाका कायमचा बंद केल्याशिवाय राहणार नाही, असे मुझफ्फर म्हणाले.