शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

१४ महिन्यांत १२८ ठिकाणी फुटल्या जलवाहिन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:13 IST

जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत ३२ ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील विविध भागांत मेट्रो, रस्त्यांची डागडुजी तसेच नवीन रस्त्यांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान रस्ते खोदले जात असल्याने जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १४ महिन्यांत १२८ ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली  आहे. 

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे ठाणे शहरातील मेट्रोच्या कामांसह रस्त्यांच्या नूतनीकरणासह डागडुजीची कामे थांबली होती.  कालांतराने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा विविध संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना सुरुवात झाली. त्यानुसार ठाणे शहरात मनपातर्फे रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, काँक्रिटीकरणाची कामे तयार करणे आदी कामे मोठ्या प्रमाणात व वेगाने सुरू झाली आहेत.  मात्र, या कामांसाठी खोदण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये टाकलेल्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित ९६ जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या आहे. यामध्ये सर्वाधिक २० जलवाहिन्या नोव्हेंबरमध्ये फुटल्याची नोंद आहे. त्या खालोखाल डिसेंबरमध्ये  १४ जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

nजानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत ३२ ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. nयामध्ये जानेवारीत १०, फेब्रुवारीत १६, तर, मार्चमध्ये काही ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या असल्याची नोंद आहे. जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी