शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उल्हासनगरात जलवाहिन्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:25 IST

लाखो लीटर पाणी वाया : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना टंचाईची झळ

उल्हासनगर : शहरातील बहुतांश जलवाहिन्याना गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पाणीगळती बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उल्हासनगरात काही वर्षांपूर्वी ३०० कोटींच्या निधीतून पाणीपुरवठा वितरण योजना राबवण्यात आली. झोपडपट्टीतील काही भाग सोडल्यास संपूर्ण शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच सात उंच आणि एक भूमिगत जलकुंभ बांधून पाणी वितरण समसमान होण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. मात्र, या योजनेचे काम संथगतीने आणि अर्धवट झाल्याने नागरिकांना दररोज मिळणारे पाणी अनेक भागात दिवसाआड पुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बंद करायला हव्या होत्या. मात्र, त्या सुरू राहिल्याने पाणी गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील खेमानी, रमाबाई आंबेडकरनगर टेकडी, सुभाष टेकडी, शांतीनगर, कुर्ला कॅम्प, गोलमैदान आदींसह शहरातील बहुतांश भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. पाणीगळतीमुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जात असून पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.आयुक्तांनी संबंधित विभागाला पाणी गळती बंद करण्याचे आदेश देऊ न विशेष पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विशेष निधीची तरतूद केल्याचे सांगितले होते. अद्यापही गळतीचे काम सुरू झाले नाही, असा आरोप नगरसेवकांसह नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत इतर ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी वाढीव ५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.पाणीगळतीचे काम युद्धपातळीवरशहरात बहुतांश ठिकाणी नवीन जलवाहिन्यांतून तर काही भागांत जुन्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. जुन्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणीगळतीचा प्रश्न निर्माण झाला असून पाणीगळती बंद करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. जी. सोनावणे यांनी दिलेआहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी