शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उल्हासनगरात जलवाहिन्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:25 IST

लाखो लीटर पाणी वाया : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना टंचाईची झळ

उल्हासनगर : शहरातील बहुतांश जलवाहिन्याना गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पाणीगळती बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उल्हासनगरात काही वर्षांपूर्वी ३०० कोटींच्या निधीतून पाणीपुरवठा वितरण योजना राबवण्यात आली. झोपडपट्टीतील काही भाग सोडल्यास संपूर्ण शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच सात उंच आणि एक भूमिगत जलकुंभ बांधून पाणी वितरण समसमान होण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. मात्र, या योजनेचे काम संथगतीने आणि अर्धवट झाल्याने नागरिकांना दररोज मिळणारे पाणी अनेक भागात दिवसाआड पुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बंद करायला हव्या होत्या. मात्र, त्या सुरू राहिल्याने पाणी गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील खेमानी, रमाबाई आंबेडकरनगर टेकडी, सुभाष टेकडी, शांतीनगर, कुर्ला कॅम्प, गोलमैदान आदींसह शहरातील बहुतांश भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. पाणीगळतीमुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जात असून पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.आयुक्तांनी संबंधित विभागाला पाणी गळती बंद करण्याचे आदेश देऊ न विशेष पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विशेष निधीची तरतूद केल्याचे सांगितले होते. अद्यापही गळतीचे काम सुरू झाले नाही, असा आरोप नगरसेवकांसह नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत इतर ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी वाढीव ५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.पाणीगळतीचे काम युद्धपातळीवरशहरात बहुतांश ठिकाणी नवीन जलवाहिन्यांतून तर काही भागांत जुन्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. जुन्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणीगळतीचा प्रश्न निर्माण झाला असून पाणीगळती बंद करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. जी. सोनावणे यांनी दिलेआहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी