शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात जलवाहिन्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:25 IST

लाखो लीटर पाणी वाया : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना टंचाईची झळ

उल्हासनगर : शहरातील बहुतांश जलवाहिन्याना गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पाणीगळती बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उल्हासनगरात काही वर्षांपूर्वी ३०० कोटींच्या निधीतून पाणीपुरवठा वितरण योजना राबवण्यात आली. झोपडपट्टीतील काही भाग सोडल्यास संपूर्ण शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच सात उंच आणि एक भूमिगत जलकुंभ बांधून पाणी वितरण समसमान होण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. मात्र, या योजनेचे काम संथगतीने आणि अर्धवट झाल्याने नागरिकांना दररोज मिळणारे पाणी अनेक भागात दिवसाआड पुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बंद करायला हव्या होत्या. मात्र, त्या सुरू राहिल्याने पाणी गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील खेमानी, रमाबाई आंबेडकरनगर टेकडी, सुभाष टेकडी, शांतीनगर, कुर्ला कॅम्प, गोलमैदान आदींसह शहरातील बहुतांश भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. पाणीगळतीमुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जात असून पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.आयुक्तांनी संबंधित विभागाला पाणी गळती बंद करण्याचे आदेश देऊ न विशेष पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विशेष निधीची तरतूद केल्याचे सांगितले होते. अद्यापही गळतीचे काम सुरू झाले नाही, असा आरोप नगरसेवकांसह नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत इतर ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी वाढीव ५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.पाणीगळतीचे काम युद्धपातळीवरशहरात बहुतांश ठिकाणी नवीन जलवाहिन्यांतून तर काही भागांत जुन्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. जुन्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणीगळतीचा प्रश्न निर्माण झाला असून पाणीगळती बंद करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. जी. सोनावणे यांनी दिलेआहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी