शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जलपर्णी अडकली गाळात

By admin | Updated: June 26, 2017 01:28 IST

कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कामवारी नदीतील जलपर्णी गाळात रूतली आहे. या वनस्पतींना पुढे मार्ग न मिळाल्यास परिसरात पाणी साचण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.कामवारी नदीतील गाळ काढण्याकडे महसूल विभाग, लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचा पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. तीन महिन्यांपासून ही नदी कोरडी होती.यामुळे विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्तींचे अवशेषही बाहेर आले होते. तर काही ठिकाणी नदीतील साचलेल्या पाण्यात जलपर्णी पसरल्या होत्या. नदीवर बांधलेल्या धरणाच्या पलिकडेही साचलेल्या पाण्यात जलपर्णी होत्या. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नदीतील प्रवाह वाढून या सर्व जलपर्णी भिवंडी-वाडा मार्गावरील पुलाखाली अडकल्या. पुलाच्या पलिकडे म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सुकलेल्या नदीपात्रात कचरा टाकल्याने या जलपर्णीस पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने ते एकाच जागी साचलेल्या आहेत. तालुक्यातील दहापेक्षा जास्त गावांमधील पाणी नदीतून वाहते. कामवारी नदीच्या एका बाजूला शेलार गाव असून दुसऱ्या बाजूला रहिवाशांनी बांधकाम करून नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे.त् यामुळे नदीचा प्रवाह वेगवान होऊन जलपर्णीव्दारे ते पाणी अडले तर ते पाणी शेलार भागात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या खाडीला रविवारी पहाटेच्यावेळेस भरती आल्याने मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या काही भागातील पाण्याचा निचरा झाला नाही. परंतु पुन्हा भरती आणि मुसळधार पाऊस झाला तर पूरपरिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.