शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

जलकुंभ बनले गर्दुल्ले, नशेखोरांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:58 IST

उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : बंद पडलेले जलकुंभ सुरू करण्याची मागणी

उल्हासनगर : पाणीपुरवठ्याचे वितरण समसमान होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले. त्यापैकी काही जलकुंभ अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्या जागेचा वापर गर्दुल्ले, नशाखोर, भुरटे चोर करत आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी याबाबत निवेदन देत पालिकेचे लक्ष वेधले आहे. उल्हासनगरात ३०० कोटींच्या पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी, उंच आणि भूमिगत जलकुुंभ, पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. त्यापैकी कॅम्प नं. १ व ५ येथील टिळकनगर आणि प्रेमनगर टेकडी येथील जलकुंभ १० वर्षांपासून वापराविना पडून आहेत. जलकुंभ बांधण्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वापराविना असलेल्या जलकुंभप्रकरणी ठेकेदारावर महापालिकेने कारवाई का केली नाही, असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी उपस्थित केला. जलकुंभाशेजारील जागेचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटेचोर आदींनी घेतला आहे. गेल्याच आठवड्यात कॅम्प नं. ४, कुर्ला कॅम्प, सुभाष टेकडी येथील जलकुंभाखाली गोळीबार होऊ न एका तरुणाचा बळी गेला आहे. तसाच प्रकार इतर ठिकाणी होण्याची शक्यता शेख यांनी व्यक्त करून तसे पत्र महापालिकेला दिले.महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी जलकुंभ वापराविना पडून असल्याचे मान्य केले. तसेच जलकुंभाची क्षमता तपासून वापरण्यास सुरुवात करण्याचे संकेत दिले. जलकुंभावर रात्रीपाळीवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केल्यास गर्दुल्ले, नशेखोर आणि भुरट्या चोरांवर वचक बसणार असल्याचे मैन्नुद्दीन शेख यांनी सांगितले. जलकुंभ सुरक्षित राहणार असल्याचे शेख म्हणाले. टिळकनगर येथील जलकुंभ परिसरात समाजमंदिरांचे भूमिपूजन दोनदा होऊ नही काम पूर्ण झाले नसल्याचा प्रकारही त्यांनी उघड केला. महापालिकेचे समाजमंदिर, पम्पिंग स्टेशन जागा, जलकुंभ आणि खुल्या जागा, उद्याने, शौचालय, मैदाने आदी परिसरांत भुरटेचोर, नशेखोर, गर्दुल्ले आदींचा वावर वाढल्याचे काही घटनांवरून उघड झाले आहे.जलकुंभाची सुरक्षा धोक्यातमहापालिका जलकुंभ, उद्याने सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे जलकुंभाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यंतरी, काही जलकुंभांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. सद्य:स्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.