शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ बनले गर्दुल्ले, नशेखोरांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:58 IST

उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : बंद पडलेले जलकुंभ सुरू करण्याची मागणी

उल्हासनगर : पाणीपुरवठ्याचे वितरण समसमान होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले. त्यापैकी काही जलकुंभ अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्या जागेचा वापर गर्दुल्ले, नशाखोर, भुरटे चोर करत आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी याबाबत निवेदन देत पालिकेचे लक्ष वेधले आहे. उल्हासनगरात ३०० कोटींच्या पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी, उंच आणि भूमिगत जलकुुंभ, पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. त्यापैकी कॅम्प नं. १ व ५ येथील टिळकनगर आणि प्रेमनगर टेकडी येथील जलकुंभ १० वर्षांपासून वापराविना पडून आहेत. जलकुंभ बांधण्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वापराविना असलेल्या जलकुंभप्रकरणी ठेकेदारावर महापालिकेने कारवाई का केली नाही, असा प्रश्न मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दीन शेख यांनी उपस्थित केला. जलकुंभाशेजारील जागेचा ताबा गर्दुल्ले, नशेखोर, भुरटेचोर आदींनी घेतला आहे. गेल्याच आठवड्यात कॅम्प नं. ४, कुर्ला कॅम्प, सुभाष टेकडी येथील जलकुंभाखाली गोळीबार होऊ न एका तरुणाचा बळी गेला आहे. तसाच प्रकार इतर ठिकाणी होण्याची शक्यता शेख यांनी व्यक्त करून तसे पत्र महापालिकेला दिले.महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी जलकुंभ वापराविना पडून असल्याचे मान्य केले. तसेच जलकुंभाची क्षमता तपासून वापरण्यास सुरुवात करण्याचे संकेत दिले. जलकुंभावर रात्रीपाळीवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केल्यास गर्दुल्ले, नशेखोर आणि भुरट्या चोरांवर वचक बसणार असल्याचे मैन्नुद्दीन शेख यांनी सांगितले. जलकुंभ सुरक्षित राहणार असल्याचे शेख म्हणाले. टिळकनगर येथील जलकुंभ परिसरात समाजमंदिरांचे भूमिपूजन दोनदा होऊ नही काम पूर्ण झाले नसल्याचा प्रकारही त्यांनी उघड केला. महापालिकेचे समाजमंदिर, पम्पिंग स्टेशन जागा, जलकुंभ आणि खुल्या जागा, उद्याने, शौचालय, मैदाने आदी परिसरांत भुरटेचोर, नशेखोर, गर्दुल्ले आदींचा वावर वाढल्याचे काही घटनांवरून उघड झाले आहे.जलकुंभाची सुरक्षा धोक्यातमहापालिका जलकुंभ, उद्याने सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे जलकुंभाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यंतरी, काही जलकुंभांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. सद्य:स्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.