शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

निवडणूक संपताच पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:30 IST

गरज सरो अन् वैद्य मरो : सत्ताधाऱ्यांविरोधात ठाणेकरांमध्ये संताप

ठाणे : निवडणुकीची धामधूम संपताच ठाण्यातील पाणीकपात बुधवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये किंवा त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम होऊ नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी शहराची पाणीकपात मागील १५ दिवस बंद केली होती. परंतु, आता मतदान झाल्यानंतर बुधवारपासून पुन्हा २४ तासांची पाणीकपात सुरू झाली आहे. सत्ताधाºयांच्या ‘गरज सरो, अन् वैद्य मरो’ या धोरणाविरोधात आता ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून पाणी समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर, अचानक पाणीकपात रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान मागील १५ दिवस बहुतेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. परंतु, मतदान झाले आणि पाणीकपात तेवढ्याच दमाने पुन्हा सुरू झाली. त्यात आज बुधवार असल्याने नियमानुसार पाणीकपात करत असल्याची माहिती महापालिकेने दिली. ती २४ तासांची राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

पाणी कपातीमुळे मतदारांची नाराजी ओढवून घेणे सत्ताधाऱ्यांना महागात पडले असते, म्हणूनच की काय, ही कपात निवडणुकीपुरती रद्द करण्यात आली होती, असे बोलले जात आहे. असे असले तरी कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील भागांत मात्र ती निवडणूक काळातही पाणीकपात सुरूच होती. इंदिरानगर, रूपादेवीपाडा या भागांनाही आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परंतु, हा प्रश्न सोडवण्याऐवजी किंवा त्यावर भाष्य करण्याऐवजी राजकीय मंडळी मात्र या पाण्यावरच आपल्या मतांची पोळी भाजून घेताना दिसते.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई