शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संपताच पाणीकपात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:30 IST

गरज सरो अन् वैद्य मरो : सत्ताधाऱ्यांविरोधात ठाणेकरांमध्ये संताप

ठाणे : निवडणुकीची धामधूम संपताच ठाण्यातील पाणीकपात बुधवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये किंवा त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम होऊ नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी शहराची पाणीकपात मागील १५ दिवस बंद केली होती. परंतु, आता मतदान झाल्यानंतर बुधवारपासून पुन्हा २४ तासांची पाणीकपात सुरू झाली आहे. सत्ताधाºयांच्या ‘गरज सरो, अन् वैद्य मरो’ या धोरणाविरोधात आता ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून पाणी समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर, अचानक पाणीकपात रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान मागील १५ दिवस बहुतेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. परंतु, मतदान झाले आणि पाणीकपात तेवढ्याच दमाने पुन्हा सुरू झाली. त्यात आज बुधवार असल्याने नियमानुसार पाणीकपात करत असल्याची माहिती महापालिकेने दिली. ती २४ तासांची राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

पाणी कपातीमुळे मतदारांची नाराजी ओढवून घेणे सत्ताधाऱ्यांना महागात पडले असते, म्हणूनच की काय, ही कपात निवडणुकीपुरती रद्द करण्यात आली होती, असे बोलले जात आहे. असे असले तरी कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील भागांत मात्र ती निवडणूक काळातही पाणीकपात सुरूच होती. इंदिरानगर, रूपादेवीपाडा या भागांनाही आजही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परंतु, हा प्रश्न सोडवण्याऐवजी किंवा त्यावर भाष्य करण्याऐवजी राजकीय मंडळी मात्र या पाण्यावरच आपल्या मतांची पोळी भाजून घेताना दिसते.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई