शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पाण्यासाठी करतात पायपीट; टँकरचा पुरवठा अपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:08 IST

ठोस उपाययोजना करण्याची आदिवासी ग्रामस्थांची मागणी

भातसानगर : शहापूर तालुक्यातील तब्बल सव्वादोनशे गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी ती तात्पुरती सोय आहे. ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

तालुक्यातील सव्वाशे गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी तो पुरेसा नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय होते. इतर कामाला लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र त्यांना इतर उपलब्ध पर्यायांचा उपयोग करावा लागतो. दिवसभर टिपटिप पडणाºया झºयाच्या स्वरूपातील पाणी असो वा दूरवरून नदी, ओहळाच्या चिपतारातील असो, त्या पाण्यासाठी मात्र जंगजंग पछाडावे लागत आहे. तालुक्यातील तेलमपाडा, धेंगणमाळ, सुसरवाडी या पाड्यातील नागरिकांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा नदीच्या अंतर्गत भागातील पात्रात पाणी आणायला जावे लागत आहे.

सकाळी पाण्यासाठी गेलेली महिला दोन तासांनंतर घरी येते, ती थकूनच! इतर महिला या ठिकाणी पाण्यासाठी जाऊन परत येतील, याची मात्र शाश्वती देता येत नाही. अशाच ठिकाणाहून या पाड्यातील महिला पाणी आणत आहेत. ७८१ लोकसंख्या असलेल्या या पाड्यातील नागरिकांना वर्षानुवर्षे उन्हाळ्याच्या दिवसांत घोटभर पाण्यासाठी झुंजावे लागत आहे.

पाड्यांमध्ये दोन दिवसांआड पाणी पुरवले जाते. मात्र, ते पुरेसे नसल्याने आम्हाला रोजच नदीवर पाण्याला जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे आमच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे .

शहापूर तालुक्यात धरणे असूनही येथील ग्रामस्थ तहानलेला आहे. दरवर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामेरे जावे लागत आहे.आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई ही वर्षानुवर्षे तशीच कायम आहे. दोनदोन दिवसांनी टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. - मंजुळा कालचिडा, ग्रामपंचायत सदस्य

या गावांना मोठी पाणीयोजना मंजूर करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. - एम.व्ही. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :Waterपाणी