शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पाण्यासाठी करतात पायपीट; टँकरचा पुरवठा अपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:08 IST

ठोस उपाययोजना करण्याची आदिवासी ग्रामस्थांची मागणी

भातसानगर : शहापूर तालुक्यातील तब्बल सव्वादोनशे गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी ती तात्पुरती सोय आहे. ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

तालुक्यातील सव्वाशे गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी तो पुरेसा नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय होते. इतर कामाला लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र त्यांना इतर उपलब्ध पर्यायांचा उपयोग करावा लागतो. दिवसभर टिपटिप पडणाºया झºयाच्या स्वरूपातील पाणी असो वा दूरवरून नदी, ओहळाच्या चिपतारातील असो, त्या पाण्यासाठी मात्र जंगजंग पछाडावे लागत आहे. तालुक्यातील तेलमपाडा, धेंगणमाळ, सुसरवाडी या पाड्यातील नागरिकांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा नदीच्या अंतर्गत भागातील पात्रात पाणी आणायला जावे लागत आहे.

सकाळी पाण्यासाठी गेलेली महिला दोन तासांनंतर घरी येते, ती थकूनच! इतर महिला या ठिकाणी पाण्यासाठी जाऊन परत येतील, याची मात्र शाश्वती देता येत नाही. अशाच ठिकाणाहून या पाड्यातील महिला पाणी आणत आहेत. ७८१ लोकसंख्या असलेल्या या पाड्यातील नागरिकांना वर्षानुवर्षे उन्हाळ्याच्या दिवसांत घोटभर पाण्यासाठी झुंजावे लागत आहे.

पाड्यांमध्ये दोन दिवसांआड पाणी पुरवले जाते. मात्र, ते पुरेसे नसल्याने आम्हाला रोजच नदीवर पाण्याला जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे आमच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे .

शहापूर तालुक्यात धरणे असूनही येथील ग्रामस्थ तहानलेला आहे. दरवर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामेरे जावे लागत आहे.आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई ही वर्षानुवर्षे तशीच कायम आहे. दोनदोन दिवसांनी टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. - मंजुळा कालचिडा, ग्रामपंचायत सदस्य

या गावांना मोठी पाणीयोजना मंजूर करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. - एम.व्ही. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :Waterपाणी