शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कळव्यात माफीयांच्या माध्यमातून पाणी चोरी; स्थानिक माजी नगरसेवकांचा यात सहभाग

By अजित मांडके | Updated: October 18, 2023 18:14 IST

राष्ट्रवादी  अजित पवार गटाचा आरोप

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळवा पूर्व भागातील भास्कर नगर, पौंड पाडा आदी भागात असलेल्या पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर आता येथे पाण्याची चोरी होत असल्यानेच नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पाणी माफियांच्या विरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी, त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी राष्टÑवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. परंतु आता येथील पाण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाय योजनेमुळे पाणी समस्या सुटणार असतांना केवळ याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी आव्हाड गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कळवा पूर्व येथे गणपती दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटूंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी ५०० रुपये गोळा करत असतात अशी माहिती दिली. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलीसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड दरमहिन्याला लोकांकडून ३० ते ४० लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली, ही खंडणी वसूल करणार्‍यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुल्ला यांनी सांगितले.

कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोनेष्शर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २४० कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. या अमृत योजनेतुन कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार आहोत, ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली १४ वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी