शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

बिल्डरांसाठी पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:48 IST

प्रशासनाला अपयश : उल्हास नदी परिसरात टँकरलॉबी सक्रिय, नागरिकांना टंचाईची झळ

बदलापूर : बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे अनेक सोसायट्या या टँकरवरच अवलंबून आहेत. पिण्याच्या पाण्यावर टँकरलॉबी सक्रिय असतानाच आता बांधकाम व्यवसायाला पाणीपुरवठा करण्यातही टँकरलॉबी कमी पडलेली नाही. शहरातील अनेक टँकरचालक उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत. उल्हास नदीतून होणारी पाणीचोरी रोखण्यात स्थानिक प्रशासन आणि लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.

बदलापूर शहरात पाण्याचा व्यापार जास्तच तेजीत आला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध आणण्याची वेळ बदलापुरात आली आहे. बांधकामासाठी जो पाणीपुरवठा केला जात आहे, ते पाणी थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. मात्र, असे असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी नदीतून उचलण्यात येत आहे. शहरांना दिलेल्या पाण्याच्या आरक्षणापेक्षा जास्तीचे पाणी उचलल्यास त्या शहरांवर कारवाईचा आदेश पाटबंधारे विभागाने दिला आहे.

मात्र, शहरांसाठी उचलण्यात येणारे पाणी हे निश्चित प्रमाणातच उचलणे गरजेचे असताना शहरांत इतर ठिकाणी चोरून मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्यात येत आहे. उल्हास नदीच्या पात्रातून रोज शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून घेतात. त्यासाठी कुणाची परवानगीही घेतली जात नाही किंवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही. जे काही आहे, ते पोलिसांना सोबत घेऊन सर्रासपणे सुरू आहे. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही ते कोणतीच कारवाई करत नाहीत. तर, ज्या प्रशासनाकडे याची जबाबदारी आहे, तेही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीपात्रातून पाणीचोरी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बदलापूर गावाकडील उल्हास नदीवरील पूल. या पुलाखालून नदीपात्रात जाणे शक्य असल्याने या पात्रातून दररोज पाण्याची चोरी केली जाते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद करणे सहज शक्य असतानाही त्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही.एक ते दोन हजारांत टँकरची विक्री पाणीचोरांचा वाढत आहे दबदबापोलिसांना हाताशी धरून हा व्यवसाय सुरू असल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही पाणीचोरी सुरू आहे. यावर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीतील पाणी थेट बांधकाम व्यावसायिकांना एक ते दोन हजारांत विकले जाते.उलट, टँकरमाफियांना स्वातंत्र्य देण्याचे कामच केले जात आहे. ठरलेल्या टँकरव्यतिरिक्त शहरातील दुसरा कोणताही टँकर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आल्यावर त्याला रोखण्याचे काम केले जाते. यावरून, हे स्पष्ट होत आहे की, पाणी चोरणाºया टँकरमालकांचा दबदबा हा किती वाढला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका