शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांसाठी पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:48 IST

प्रशासनाला अपयश : उल्हास नदी परिसरात टँकरलॉबी सक्रिय, नागरिकांना टंचाईची झळ

बदलापूर : बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे अनेक सोसायट्या या टँकरवरच अवलंबून आहेत. पिण्याच्या पाण्यावर टँकरलॉबी सक्रिय असतानाच आता बांधकाम व्यवसायाला पाणीपुरवठा करण्यातही टँकरलॉबी कमी पडलेली नाही. शहरातील अनेक टँकरचालक उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत. उल्हास नदीतून होणारी पाणीचोरी रोखण्यात स्थानिक प्रशासन आणि लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.

बदलापूर शहरात पाण्याचा व्यापार जास्तच तेजीत आला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध आणण्याची वेळ बदलापुरात आली आहे. बांधकामासाठी जो पाणीपुरवठा केला जात आहे, ते पाणी थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. मात्र, असे असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी नदीतून उचलण्यात येत आहे. शहरांना दिलेल्या पाण्याच्या आरक्षणापेक्षा जास्तीचे पाणी उचलल्यास त्या शहरांवर कारवाईचा आदेश पाटबंधारे विभागाने दिला आहे.

मात्र, शहरांसाठी उचलण्यात येणारे पाणी हे निश्चित प्रमाणातच उचलणे गरजेचे असताना शहरांत इतर ठिकाणी चोरून मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्यात येत आहे. उल्हास नदीच्या पात्रातून रोज शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून घेतात. त्यासाठी कुणाची परवानगीही घेतली जात नाही किंवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही. जे काही आहे, ते पोलिसांना सोबत घेऊन सर्रासपणे सुरू आहे. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही ते कोणतीच कारवाई करत नाहीत. तर, ज्या प्रशासनाकडे याची जबाबदारी आहे, तेही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीपात्रातून पाणीचोरी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बदलापूर गावाकडील उल्हास नदीवरील पूल. या पुलाखालून नदीपात्रात जाणे शक्य असल्याने या पात्रातून दररोज पाण्याची चोरी केली जाते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद करणे सहज शक्य असतानाही त्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही.एक ते दोन हजारांत टँकरची विक्री पाणीचोरांचा वाढत आहे दबदबापोलिसांना हाताशी धरून हा व्यवसाय सुरू असल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही पाणीचोरी सुरू आहे. यावर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीतील पाणी थेट बांधकाम व्यावसायिकांना एक ते दोन हजारांत विकले जाते.उलट, टँकरमाफियांना स्वातंत्र्य देण्याचे कामच केले जात आहे. ठरलेल्या टँकरव्यतिरिक्त शहरातील दुसरा कोणताही टँकर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आल्यावर त्याला रोखण्याचे काम केले जाते. यावरून, हे स्पष्ट होत आहे की, पाणी चोरणाºया टँकरमालकांचा दबदबा हा किती वाढला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका