शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कल्याण-डाेंबवलीच्या माजी उपमहापौरांच्या घरी टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

कल्याण : २७ गावांत पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत असताना त्याची झळ भाजपचे माजी नगरसेवक व उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही ...

कल्याण : २७ गावांत पाणीटंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत असताना त्याची झळ भाजपचे माजी नगरसेवक व उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनाही बसली आहे. कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या पिसवली गावात राहणारे भाजपचे भोईर यांना चक्क टँकरने पाणी मागवण्याची वेळ आली आहे. या पाणीटंचाईकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. अन्यथा, पाणीटंचाईमुळे २७ गावांतील नागरिक होरपळू निघतील याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

भोईर हे पिसवली परिसरात राहतात. त्यांच्या घरी पाणी नसल्याने त्यांनी १२०० रुपयांना खासगी टँकर मागविला. एक टँकरचे पाणी त्यांना आठवडाभर पुरवून वापरण्याची वेळ आली आहे. महापालिकाही टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरने पाणीपुरवठा करते. एका टँकरच्या फेरीला पालिकेकडून ४५० रुपये आकारले जातात. २७ गावांत पाण्याची समस्या केवळ पिसवली परिसराला भेडसावत नसून सगळ्या भागाला भेडसावत आहे. मागच्या आठवड्यात भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी पाणीटंचाईविरोधात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात आठवडा उलटून गेला तरी परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. एमआयडीसीकडून २७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचे पाणीबिल महापालिका भरते. एमआयडीसीकडून केला जाणारा पाणीपुरवठा हा १.५ किलो दाबाने केला जात होता. आता हा दाब कमी करून तो ०.८० किलोवर आणला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणी कमी येत आहे. त्यामुळे पाण्याचा दाब वाढविण्यात यावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे़

टँकरवाल्यांची चलती

२७ गावांतील अनेक सोसायट्या आणि बंगलोवजा घरे खासगी टँकरद्वारे पाणी मागवून तहान भागवित आहेत. त्यामुळे टँकरवाल्यांची चलती आहे. महापालिकेच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या कामाला गती देण्याची गरज असल्याचे भोईर यांनी सांगितले.

फोटो-कल्याण-टँकरने पाणीपुरवठा

--------------