शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरही वाढला

By admin | Updated: February 16, 2016 02:42 IST

वडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ

उल्हासनगर : निवडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ करणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीला सादर झाला. उत्पन्नवाढीच्या नव्या साधनांचा विचार न झाल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर एकही मोठा प्रकल्प हाती न घेतल्याने सत्ताधाऱ्यांतही अर्थसंकल्पाबद्दल नाराजी असून विरोधकांनीही त्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, ही दरवाढ केली नाही, तर शहराचा विकास अशक्य असल्याचे परखड मत आयुक्तांनी नोंदवले आहे.महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी हा ६०७.३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केला.पाणीपट्टीवाढीतून ५१ कोटी, तर मालमत्ता करवाढीतून १६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. याखेरीज, पालिका शाळांसाठी ४२ कोटी, चालिया मंदिर तीर्थस्थळाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद आहे. रस्त्याच्या सिमेंट क्राँकिटीकरणासाठी ५३.३४ कोटींची तरतूद आहे. पालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वर्षानुवर्षे वाढ झालेली नाही. शहर विकास, उत्पन्न-खर्चातील तफावत दूर करण्यासाठी नाइलाजास्तव ७० कोटींची करवाढ करावी लागल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)भुयारी गटार योजना, खेमानी नाला व वालधुनी नदीचा विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, पालिका शाळा अद्ययावत करून पुनर्बांधणी करणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी शहर विकासासाठी इतर उत्पन्नाच्या मार्गासह दरवाढ ‘जैसे थे’ ठेवली तर शहर विकास शक्य असल्याचे परखड मत त्यांनी नोंदवले.