शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरही वाढला

By admin | Updated: February 16, 2016 02:42 IST

वडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ

उल्हासनगर : निवडणुकीचे वर्ष असूनही फारसे मोठे प्रकल्प नसलेला, खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी दुप्पट, तर मालमत्ताकरात सरसकट २० टक्के वाढ करणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीला सादर झाला. उत्पन्नवाढीच्या नव्या साधनांचा विचार न झाल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर एकही मोठा प्रकल्प हाती न घेतल्याने सत्ताधाऱ्यांतही अर्थसंकल्पाबद्दल नाराजी असून विरोधकांनीही त्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, ही दरवाढ केली नाही, तर शहराचा विकास अशक्य असल्याचे परखड मत आयुक्तांनी नोंदवले आहे.महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी हा ६०७.३० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केला.पाणीपट्टीवाढीतून ५१ कोटी, तर मालमत्ता करवाढीतून १६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. याखेरीज, पालिका शाळांसाठी ४२ कोटी, चालिया मंदिर तीर्थस्थळाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद आहे. रस्त्याच्या सिमेंट क्राँकिटीकरणासाठी ५३.३४ कोटींची तरतूद आहे. पालिकेच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वर्षानुवर्षे वाढ झालेली नाही. शहर विकास, उत्पन्न-खर्चातील तफावत दूर करण्यासाठी नाइलाजास्तव ७० कोटींची करवाढ करावी लागल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)भुयारी गटार योजना, खेमानी नाला व वालधुनी नदीचा विकास, वाढीव पाणीपुरवठा योजना, पालिका शाळा अद्ययावत करून पुनर्बांधणी करणे, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी शहर विकासासाठी इतर उत्पन्नाच्या मार्गासह दरवाढ ‘जैसे थे’ ठेवली तर शहर विकास शक्य असल्याचे परखड मत त्यांनी नोंदवले.