शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

डोंबिवली निवासी परिसरातील पाण्याची टाकी वापराविना पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:41 IST

 शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते

डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते असा मुद्दा डोंबिवली वेलफेअर अशोशिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. 

एमआयडीसी निवारी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी एमआयडीसीने उभारली होती. ही टाकी वापरात नसल्याने ती जुनी झाली आहे. या टाकीचा वापर नसल्याने ती पाडून त्याठिकाणी नवी उभारावी. तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. ती वापरा योग्य असल्यास तिचा पुनर्वापर करण्यात यावा. या विषयी माहितीच्या अधिकारात जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी एमआयडीसीकडे माहिती मागितली होती. एमआयडीसीकडून निवासी व ग्रामीण भागास 210 दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. त्यासाठी निवासी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. ही टाकी 1980 साली बांधण्यात आली. तिचा वापर सुरु होता. साधरणत: दोन ते तीन वर्षात तिचा वापर बंद झाला. 1982 सालापासून तिचा वापर बंद झाला आहे. ही टाकी वापराविना बंद आहे. या टाकीच्या उभारणीवर एमआयडीसीने किती खर्च केला होता. त्याची माहिती एमआयडीसीकडे उपलब्ध नाही. सध्या ज्या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे मीटर टेस्टींगची प्रयोगशाळा चालविली जाते. त्यामुळे टाकीत पाण्याचा वापर फारच कमी आहे. टाकीतील थोडेफार पाणी टेस्टींगपश्चात आसपासच्या झाडांना टाकले जाते. या टाकीची संरचना तपासून तिचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन ती वापरा योग्य आहे की नाही याची पाहणी केली जाईल असे एमआयडीसीकडून कळविण्यात आलेले आहे. 

    27 गावे व औद्योगिक निवासी परिसर हा कल्याण डोंबिवली महापालिकेत होता. त्यानंतर 2002 साली 27 गावांसह औद्योगिक निवासी परिसर वगळण्यात आला. पुन्हा जून 2015 पासून 27 गावे व औद्योगिक निवासी परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. 27 गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. आजमितीस 27 गावांना दररोज एमआयडीसीकडून 30 दस लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. 27 गावात पाणी वितरण व्यवस्थेचे जाळे नाही तसेच 27 गावात पाणी साठवणूक करण्यासाठी पाण्याच्या टाक्या नाहीत. एमआयडीसी निवासी परिसरातील वापराविना पडून असलेली 20 लाख लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर केल्यास काही अंशी 27 गावातील काही गावांसह निवासी भागाला दिलासा मिळू शकतो. साठविलेले 20 लाख लिटर पाणी सम प्रमाणात काही ठिकाणी वितरीत करता येऊ शकते. याकडे अशोशिएशनच्या पदाधिका:यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली