शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

डोंबिवली निवासी परिसरातील पाण्याची टाकी वापराविना पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:41 IST

 शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते

डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते असा मुद्दा डोंबिवली वेलफेअर अशोशिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. 

एमआयडीसी निवारी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी एमआयडीसीने उभारली होती. ही टाकी वापरात नसल्याने ती जुनी झाली आहे. या टाकीचा वापर नसल्याने ती पाडून त्याठिकाणी नवी उभारावी. तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. ती वापरा योग्य असल्यास तिचा पुनर्वापर करण्यात यावा. या विषयी माहितीच्या अधिकारात जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी एमआयडीसीकडे माहिती मागितली होती. एमआयडीसीकडून निवासी व ग्रामीण भागास 210 दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. त्यासाठी निवासी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. ही टाकी 1980 साली बांधण्यात आली. तिचा वापर सुरु होता. साधरणत: दोन ते तीन वर्षात तिचा वापर बंद झाला. 1982 सालापासून तिचा वापर बंद झाला आहे. ही टाकी वापराविना बंद आहे. या टाकीच्या उभारणीवर एमआयडीसीने किती खर्च केला होता. त्याची माहिती एमआयडीसीकडे उपलब्ध नाही. सध्या ज्या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे मीटर टेस्टींगची प्रयोगशाळा चालविली जाते. त्यामुळे टाकीत पाण्याचा वापर फारच कमी आहे. टाकीतील थोडेफार पाणी टेस्टींगपश्चात आसपासच्या झाडांना टाकले जाते. या टाकीची संरचना तपासून तिचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन ती वापरा योग्य आहे की नाही याची पाहणी केली जाईल असे एमआयडीसीकडून कळविण्यात आलेले आहे. 

    27 गावे व औद्योगिक निवासी परिसर हा कल्याण डोंबिवली महापालिकेत होता. त्यानंतर 2002 साली 27 गावांसह औद्योगिक निवासी परिसर वगळण्यात आला. पुन्हा जून 2015 पासून 27 गावे व औद्योगिक निवासी परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. 27 गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. आजमितीस 27 गावांना दररोज एमआयडीसीकडून 30 दस लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. 27 गावात पाणी वितरण व्यवस्थेचे जाळे नाही तसेच 27 गावात पाणी साठवणूक करण्यासाठी पाण्याच्या टाक्या नाहीत. एमआयडीसी निवासी परिसरातील वापराविना पडून असलेली 20 लाख लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर केल्यास काही अंशी 27 गावातील काही गावांसह निवासी भागाला दिलासा मिळू शकतो. साठविलेले 20 लाख लिटर पाणी सम प्रमाणात काही ठिकाणी वितरीत करता येऊ शकते. याकडे अशोशिएशनच्या पदाधिका:यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली