शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

By admin | Updated: October 19, 2015 00:56 IST

पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेपावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे. या धरणातील पाणी पिण्यासह उद्योगाना १५ जुलैपर्यंत पुरवणे शक्य व्हावे, यासाठी दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४२ गावपाड्यांना आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सक्तीची होणार आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२१४.६७ मिमी पाऊस कमी पडला आहे. आंध्रा धरणात ५०.०६ टक्के पाणी साठा असून तेथे ६४४ मिमी. पाऊस कमी पडला . बारवी धरणात ८९.१९ टक्के साठा असून पाऊस १००५ मिमी कमी झाला. त्यामुळे यावर्षी जादा पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार. गेल्या वर्षी सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी १४ टक्के कपात झाली होती. सध्या बारवीत १६०.५६ तर आंध्रात १६९.७० दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. त्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या पाच महापालिकां, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ गावाना या उल्हास नदी व बारवी धरणातून शहरांसह औद्योगाना वर्षभर ३५०.१६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होणार. सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दररोज पुरवावे लागणार आहे. दोन दिवसाच्या पाणी कपातीतून ते शक्य होणार आहे.>सध्या मोहने बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी होत असून उर्वरित पाणी खाडीत वाहून जात आहे. ते पाणी लवकरच कमी पडणार आहे. त्या आधी दोन दिवसांच्या कपातीचा निर्णय लागू होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. >बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आंध्राचे पाणी उल्हास नदीतून स्टेमघर प्राधिकरणाद्वारे केला जातो. कपातीच्या धोरणामुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवसांचे पाणी उचलण्यास मनाई केली जाणार आहे.