शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

By admin | Updated: October 19, 2015 00:56 IST

पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेपावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे. या धरणातील पाणी पिण्यासह उद्योगाना १५ जुलैपर्यंत पुरवणे शक्य व्हावे, यासाठी दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४२ गावपाड्यांना आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सक्तीची होणार आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२१४.६७ मिमी पाऊस कमी पडला आहे. आंध्रा धरणात ५०.०६ टक्के पाणी साठा असून तेथे ६४४ मिमी. पाऊस कमी पडला . बारवी धरणात ८९.१९ टक्के साठा असून पाऊस १००५ मिमी कमी झाला. त्यामुळे यावर्षी जादा पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार. गेल्या वर्षी सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी १४ टक्के कपात झाली होती. सध्या बारवीत १६०.५६ तर आंध्रात १६९.७० दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. त्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या पाच महापालिकां, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ गावाना या उल्हास नदी व बारवी धरणातून शहरांसह औद्योगाना वर्षभर ३५०.१६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होणार. सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दररोज पुरवावे लागणार आहे. दोन दिवसाच्या पाणी कपातीतून ते शक्य होणार आहे.>सध्या मोहने बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी होत असून उर्वरित पाणी खाडीत वाहून जात आहे. ते पाणी लवकरच कमी पडणार आहे. त्या आधी दोन दिवसांच्या कपातीचा निर्णय लागू होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. >बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आंध्राचे पाणी उल्हास नदीतून स्टेमघर प्राधिकरणाद्वारे केला जातो. कपातीच्या धोरणामुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवसांचे पाणी उचलण्यास मनाई केली जाणार आहे.