शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

By admin | Updated: October 19, 2015 00:56 IST

पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेपावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे. या धरणातील पाणी पिण्यासह उद्योगाना १५ जुलैपर्यंत पुरवणे शक्य व्हावे, यासाठी दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४२ गावपाड्यांना आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सक्तीची होणार आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२१४.६७ मिमी पाऊस कमी पडला आहे. आंध्रा धरणात ५०.०६ टक्के पाणी साठा असून तेथे ६४४ मिमी. पाऊस कमी पडला . बारवी धरणात ८९.१९ टक्के साठा असून पाऊस १००५ मिमी कमी झाला. त्यामुळे यावर्षी जादा पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार. गेल्या वर्षी सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी १४ टक्के कपात झाली होती. सध्या बारवीत १६०.५६ तर आंध्रात १६९.७० दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. त्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या पाच महापालिकां, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ गावाना या उल्हास नदी व बारवी धरणातून शहरांसह औद्योगाना वर्षभर ३५०.१६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होणार. सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दररोज पुरवावे लागणार आहे. दोन दिवसाच्या पाणी कपातीतून ते शक्य होणार आहे.>सध्या मोहने बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी होत असून उर्वरित पाणी खाडीत वाहून जात आहे. ते पाणी लवकरच कमी पडणार आहे. त्या आधी दोन दिवसांच्या कपातीचा निर्णय लागू होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. >बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आंध्राचे पाणी उल्हास नदीतून स्टेमघर प्राधिकरणाद्वारे केला जातो. कपातीच्या धोरणामुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवसांचे पाणी उचलण्यास मनाई केली जाणार आहे.