शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बेकायदा बांधकामांमुळे केडीएमसीमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:37 IST

केडीएमसीची महासभा : विरोधक, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर हल्लाबोल

कल्याण: बेकायदा बांधकामधारक केडीएमसी हद्दीतील करदात्यांचे पाणी पळवत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई भेडसावत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष मनसेने शुक्रवारी महासभेत केला. यावेळी पाणीप्रश्नावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला. अखेर, पाणीप्रश्नावर सोमवारी बैठक होणार आहे, असे महापौर विनीता राणे यांनी स्पष्ट केले.

शहरातील बेकायदा बांधकामप्रकरणी निलंबित असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सु.रा. पवार व प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. बेकायदा बांधकामे तोडली जात नाहीत. अधिकाºयांवर कारवाई नाही. बेकायदा बांधकामे करदात्यांच्या तोंडचे पाणी पळवत असल्याने महापालिका हद्दीत पाणीटंचाई आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला.

बेकायदा चाळीतील एका घराला महिन्याला १०० रुपये आकारून पाणी पुरवले जाते, असे सत्ताधारी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले. पूर्वेतील पाणीसमस्या सुटलेली नाही. पश्चिमेतील शिवसेनेचे नगरसेवक जयवंत भोईर, हर्षला थवील, छाया वाघमारे यांनीही आपल्या प्रभागात पाणी येत नाही. त्यावर प्रशासन तोडगा काढत नाही, याकडे लक्ष वेधले. माझ्या प्रभागात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र, त्यात पाणीच नाही, असे भोईर म्हणाले. पिसवली येथील नगरसेविका सुनीता खंडागळे यांनीही पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचे सांगितले.

नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले, कल्याण पूर्व व अन्य ठिकाणी २५ हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. त्यामुळे करदात्यांना पाणी मिळत नाही. तर, शिवसेना नगरसेविका शालिनी वायले म्हणाल्या, पाण्यासंदर्भात बुधवारी बैठक होऊन काहीच उपयोग झाला नाही. आजही प्रभागात पाणी आलेले नाही. भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी मागील वर्षी २७ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटींची कामे करण्यात आली. तरीही, समस्या कायम आहे. पाणीटंचाई असताना आता २२ टक्के कपात लागू झाली आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.सदस्य बैठकीला गैरहजर, महापौरांचा चढला पारापाणीप्रश्नावर बुधवारी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीला प्रत्येक नगरसेवकाने उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, तेथे अनेकांनी पाठ फिरवली. सभेत पटलावर विषय नसताना हा विषय घेतला जातो. सगळ्यांनी शांत बसा, या प्रश्नावर पुन्हा बैठक घेऊ. काळे या बैठकीला आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तर सभागृहाचा वेळ अजिबात घेऊ नये. त्यावर आयुक्तांनी खुलासा करावा. तसेच पाणीप्रश्नावर पुन्हा सोमवारी बैठक घेतली जाईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.अधिकाऱयांची भरती करामहापालिकेत अधिकाऱयांची कमतरता आहे. काही जण निवृत्त झाले आहेत. काही निवृत्तीच्या मार्गावर आहे. तर, काही अधिकारी काम करत नाही. त्यामुळे अधिकाऱयांची भरती झाली पाहिजे. तरच, समस्यावर तोडगा काढणे शक्य होईल, अशी सूचना शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी केली.पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाययोजनापाटबंधारे खात्याकडून २२ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. कल्याण पूर्वेतील पाणीप्रश्नावर बुधवारी बैठक घेतली. तसेच ‘महावितरण’च्या अधिकाºयांशी शुक्रवारी बैठक घेतली. मोहने व मोहिली येथील नदीपात्रातील पाण्याची पातळी कशी राखली जाईल, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असा खुलासा आयुक्त गोविंद बोडके यांनी केला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका