शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?

By सदानंद नाईक | Updated: October 17, 2023 17:27 IST

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन जलकुंभातून पाणी सोडण्यासाठी ठेवलेले वॉलमन गेले कुठे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी केला. शहरात विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठा विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार ठेवण्यात आले.

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. योजने अंतर्गत मुख्य जलवाहिन्या नवीन टाकण्यात येऊन ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले. तसेच बुस्टर पंपिंग स्टेशनसह उभारण्यात आले. मात्र त्यानंतरही शहरात पाणी टंचाई जैसे थे आहे. पुन्हा पाणी पुरवठा योजने अंतर्गत १२५ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. कोट्यवधीच्या निधीचा उपयोग करूनही पाणी टंचाई जैसे थे आहे. महापालिकेने पाणी वितरणातील दोष जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे.

 शहरातील कॅम्प नं-४, संतोषनगर, ओटी सेक्शन, महादेवनगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तक्रारी केल्या असता, जलकुंभाचा पाणी सोडण्याचा वॉल खराब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र वॉल बदलण्यासाठी १० दिवसाचा वेळ विभागाला लागल्याची टीका बोडारे यांनी केली. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने असे प्रकार घडत असल्याचे उपायुक्त जाधव यांचे म्हणणे आहे. विभागात वॉलमन, दुरुस्तीसाठी कामगार, पाणी सोडण्यासाठी घेतलेले कामगार असे ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? असा प्रश्न बोडारे यांनी उपायुक्त जाधव यांना केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचा पदभार एका कनिष्ठ अभियंताकडे असून विभागाचे काम करण्यासाठी कंत्राटी अभियंता घेतले आहे. त्यांना या विभागाबाबत काहीएक माहिती नसल्याचा आरोपही बोडारे यांनी केला.

 चौकट आमदारांनी केला होता अपशब्दाचा वापर पाणी टंचाई बाबत गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी एमएमआरडीए, महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांनी पाणी पुरवठा अभियंता यांच्या बाबत अपशब्द वापरल्यानंतर वाद झाला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईulhasnagarउल्हासनगर