शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?

By सदानंद नाईक | Updated: October 17, 2023 17:27 IST

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन जलकुंभातून पाणी सोडण्यासाठी ठेवलेले वॉलमन गेले कुठे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी केला. शहरात विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठा विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार ठेवण्यात आले.

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. योजने अंतर्गत मुख्य जलवाहिन्या नवीन टाकण्यात येऊन ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले. तसेच बुस्टर पंपिंग स्टेशनसह उभारण्यात आले. मात्र त्यानंतरही शहरात पाणी टंचाई जैसे थे आहे. पुन्हा पाणी पुरवठा योजने अंतर्गत १२५ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. कोट्यवधीच्या निधीचा उपयोग करूनही पाणी टंचाई जैसे थे आहे. महापालिकेने पाणी वितरणातील दोष जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे.

 शहरातील कॅम्प नं-४, संतोषनगर, ओटी सेक्शन, महादेवनगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तक्रारी केल्या असता, जलकुंभाचा पाणी सोडण्याचा वॉल खराब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र वॉल बदलण्यासाठी १० दिवसाचा वेळ विभागाला लागल्याची टीका बोडारे यांनी केली. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने असे प्रकार घडत असल्याचे उपायुक्त जाधव यांचे म्हणणे आहे. विभागात वॉलमन, दुरुस्तीसाठी कामगार, पाणी सोडण्यासाठी घेतलेले कामगार असे ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? असा प्रश्न बोडारे यांनी उपायुक्त जाधव यांना केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचा पदभार एका कनिष्ठ अभियंताकडे असून विभागाचे काम करण्यासाठी कंत्राटी अभियंता घेतले आहे. त्यांना या विभागाबाबत काहीएक माहिती नसल्याचा आरोपही बोडारे यांनी केला.

 चौकट आमदारांनी केला होता अपशब्दाचा वापर पाणी टंचाई बाबत गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी एमएमआरडीए, महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांनी पाणी पुरवठा अभियंता यांच्या बाबत अपशब्द वापरल्यानंतर वाद झाला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईulhasnagarउल्हासनगर