शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?

By सदानंद नाईक | Updated: October 17, 2023 17:27 IST

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन जलकुंभातून पाणी सोडण्यासाठी ठेवलेले वॉलमन गेले कुठे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी केला. शहरात विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठा विभागात ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार ठेवण्यात आले.

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. योजने अंतर्गत मुख्य जलवाहिन्या नवीन टाकण्यात येऊन ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले. तसेच बुस्टर पंपिंग स्टेशनसह उभारण्यात आले. मात्र त्यानंतरही शहरात पाणी टंचाई जैसे थे आहे. पुन्हा पाणी पुरवठा योजने अंतर्गत १२५ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. कोट्यवधीच्या निधीचा उपयोग करूनही पाणी टंचाई जैसे थे आहे. महापालिकेने पाणी वितरणातील दोष जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडे केली आहे.

 शहरातील कॅम्प नं-४, संतोषनगर, ओटी सेक्शन, महादेवनगर आदी परिसरात गेल्या १५ दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तक्रारी केल्या असता, जलकुंभाचा पाणी सोडण्याचा वॉल खराब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र वॉल बदलण्यासाठी १० दिवसाचा वेळ विभागाला लागल्याची टीका बोडारे यांनी केली. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने असे प्रकार घडत असल्याचे उपायुक्त जाधव यांचे म्हणणे आहे. विभागात वॉलमन, दुरुस्तीसाठी कामगार, पाणी सोडण्यासाठी घेतलेले कामगार असे ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? असा प्रश्न बोडारे यांनी उपायुक्त जाधव यांना केला. तसेच पाणी पुरवठा विभागाचा पदभार एका कनिष्ठ अभियंताकडे असून विभागाचे काम करण्यासाठी कंत्राटी अभियंता घेतले आहे. त्यांना या विभागाबाबत काहीएक माहिती नसल्याचा आरोपही बोडारे यांनी केला.

 चौकट आमदारांनी केला होता अपशब्दाचा वापर पाणी टंचाई बाबत गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी एमएमआरडीए, महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत आमदारांनी पाणी पुरवठा अभियंता यांच्या बाबत अपशब्द वापरल्यानंतर वाद झाला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईulhasnagarउल्हासनगर