शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 17:55 IST

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

सदानंद नाईकउल्हासनगर : महापौर लीलाबाई अशान यांच्या मराठा सेक्शन परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी उपोषण केले. अतिरिक्त आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनसेने उपोषण मागे घेतले. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या महिन्यात पाणी टंचाईच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोरोना काळात नागरिक रस्त्यावर उतरल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांची समजूत काढली. तसेच काही नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी दिलीप सोनावणे यांच्या सोबत बोलून पाणी टंचाई सोडविण्याचे आश्वासन घेतले होते. मात्र त्यानंतरही अनियमित पाणी पुरवठा कायम आहे. या निषेधार्थ मनसेने उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले. 

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी सोमवारी जिजामाता गार्डन येथे पाणी टंचाईच्या निषेधार्थ उपोषण सुरू करताच महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकार यांनी मनसेचे सचिन कदम यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. अखेर पाणी पुरवठा विभाग जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे, जलकुंभाची साफसफाई, जलकुंभ दुरस्ती व रंगरंगोटी, अवैध नळजोडणी खंडित करणे, ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा करणे. आदी आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिल्यावर सचिन कदम यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. तसेच पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल्यास, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

कृत्रिम पाणी टंचाई व मनसेची स्टंटबाजी... महापौर लीलाबाई अशान 

महापालिकेला कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असून जलकुंभाच्या जलवाहिन्या मध्यंतरी फुटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिकेने जलवाहिन्या दुरस्तीचे काम केल्यावर पाणी नियमित व मुबलक असून मनसेचे उपोषण म्हणजे स्टंटबाजी असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर