शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 17:55 IST

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

सदानंद नाईकउल्हासनगर : महापौर लीलाबाई अशान यांच्या मराठा सेक्शन परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी उपोषण केले. अतिरिक्त आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनसेने उपोषण मागे घेतले. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या महिन्यात पाणी टंचाईच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोरोना काळात नागरिक रस्त्यावर उतरल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांची समजूत काढली. तसेच काही नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी दिलीप सोनावणे यांच्या सोबत बोलून पाणी टंचाई सोडविण्याचे आश्वासन घेतले होते. मात्र त्यानंतरही अनियमित पाणी पुरवठा कायम आहे. या निषेधार्थ मनसेने उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले. 

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी सोमवारी जिजामाता गार्डन येथे पाणी टंचाईच्या निषेधार्थ उपोषण सुरू करताच महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकार यांनी मनसेचे सचिन कदम यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. अखेर पाणी पुरवठा विभाग जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे, जलकुंभाची साफसफाई, जलकुंभ दुरस्ती व रंगरंगोटी, अवैध नळजोडणी खंडित करणे, ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा करणे. आदी आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिल्यावर सचिन कदम यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. तसेच पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल्यास, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

कृत्रिम पाणी टंचाई व मनसेची स्टंटबाजी... महापौर लीलाबाई अशान 

महापालिकेला कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असून जलकुंभाच्या जलवाहिन्या मध्यंतरी फुटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिकेने जलवाहिन्या दुरस्तीचे काम केल्यावर पाणी नियमित व मुबलक असून मनसेचे उपोषण म्हणजे स्टंटबाजी असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर