शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 17:55 IST

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत

सदानंद नाईकउल्हासनगर : महापौर लीलाबाई अशान यांच्या मराठा सेक्शन परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी उपोषण केले. अतिरिक्त आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनसेने उपोषण मागे घेतले. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या महिन्यात पाणी टंचाईच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोरोना काळात नागरिक रस्त्यावर उतरल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांची समजूत काढली. तसेच काही नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी दिलीप सोनावणे यांच्या सोबत बोलून पाणी टंचाई सोडविण्याचे आश्वासन घेतले होते. मात्र त्यानंतरही अनियमित पाणी पुरवठा कायम आहे. या निषेधार्थ मनसेने उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले. 

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी सोमवारी जिजामाता गार्डन येथे पाणी टंचाईच्या निषेधार्थ उपोषण सुरू करताच महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकार यांनी मनसेचे सचिन कदम यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले. अखेर पाणी पुरवठा विभाग जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणे, जलकुंभाची साफसफाई, जलकुंभ दुरस्ती व रंगरंगोटी, अवैध नळजोडणी खंडित करणे, ठरलेल्या वेळेत पाणी पुरवठा करणे. आदी आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिल्यावर सचिन कदम यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. तसेच पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल्यास, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

कृत्रिम पाणी टंचाई व मनसेची स्टंटबाजी... महापौर लीलाबाई अशान 

महापालिकेला कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असून जलकुंभाच्या जलवाहिन्या मध्यंतरी फुटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिकेने जलवाहिन्या दुरस्तीचे काम केल्यावर पाणी नियमित व मुबलक असून मनसेचे उपोषण म्हणजे स्टंटबाजी असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर