शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:25 IST

पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच : जनसामान्यांचे नाहक हाल

-पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरून वाहत होती, तरीही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. प्राधिकरणाने एमआयडीसीची थकबाकी भरण्यात विलंब लावल्याने शहरात पाणीपुरवठा कमी होत असून, नाहक त्रास येथील करदात्यांना सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरण उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी उचलते, तर एमआयसीडीकडून १० दशलक्ष लीटर पाणी घेते. सोबत चिखलोली धरणातून सहा दशलक्ष लीटर पाण्याची सोय करण्यात आली आहे. शहराला ६३ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतानाही तो कमी पडत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची गळती. तब्बल ३५ टक्के पाणी गळती असल्याने मुबलक पाणी असतानाही प्राधिकरणाला शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही.

त्यातच चिखलोली धरणातील पाणी दूषित झाल्याचे कारण पुढे करून प्राधिकरणाने पुरवठा बंद केला आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यात वाढीव पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. मात्र, चिखलोली धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसी तयार होत नसल्याने अडचणी वाढत आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अंगावर पाणीबिलापोटी मोठी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्राधिकरणाला वाढीव पाणी देण्यास तयार नाही. या गोंधळामुळे शहरात महिन्याभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आता शहरात पाण्यासाठी आंदोलने होत असल्याने प्राधिकरणाने लागलीच थकीत बिलांपैकी सात कोटी ५० लाख रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. त्यामुळे आता वाढीव चार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले आहे. असे असले, तरी अजूनही दोन दशलक्ष लीटर पाण्याची तूट कायम आहे. शहरातील टंचाई ही जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या वादात अडकली आहे, तर दुसरीकडे एमआयडीसीच्या बारवी धरणातून वाढीव पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने त्याचा दुहेरी फटका शहराला बसत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथWaterपाणी