शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लालफितशाहीमुळे पाणीटंचाई; पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:25 IST

पुरेसा पाऊस पडूनही शहरे तहानलेलीच : जनसामान्यांचे नाहक हाल

-पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरून वाहत होती, तरीही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. प्राधिकरणाने एमआयडीसीची थकबाकी भरण्यात विलंब लावल्याने शहरात पाणीपुरवठा कमी होत असून, नाहक त्रास येथील करदात्यांना सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. प्राधिकरण उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी उचलते, तर एमआयसीडीकडून १० दशलक्ष लीटर पाणी घेते. सोबत चिखलोली धरणातून सहा दशलक्ष लीटर पाण्याची सोय करण्यात आली आहे. शहराला ६३ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतानाही तो कमी पडत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची गळती. तब्बल ३५ टक्के पाणी गळती असल्याने मुबलक पाणी असतानाही प्राधिकरणाला शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही.

त्यातच चिखलोली धरणातील पाणी दूषित झाल्याचे कारण पुढे करून प्राधिकरणाने पुरवठा बंद केला आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यात वाढीव पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. मात्र, चिखलोली धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसी तयार होत नसल्याने अडचणी वाढत आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अंगावर पाणीबिलापोटी मोठी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्राधिकरणाला वाढीव पाणी देण्यास तयार नाही. या गोंधळामुळे शहरात महिन्याभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आता शहरात पाण्यासाठी आंदोलने होत असल्याने प्राधिकरणाने लागलीच थकीत बिलांपैकी सात कोटी ५० लाख रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. त्यामुळे आता वाढीव चार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले आहे. असे असले, तरी अजूनही दोन दशलक्ष लीटर पाण्याची तूट कायम आहे. शहरातील टंचाई ही जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या वादात अडकली आहे, तर दुसरीकडे एमआयडीसीच्या बारवी धरणातून वाढीव पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने त्याचा दुहेरी फटका शहराला बसत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथWaterपाणी