शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारातही पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:38 IST

अंबरनाथमधील चित्र : नागरिकांना होत आहे त्रास, नेत्यांवर तक्रारींचा पाऊस

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच आता शहरातील पाणी समस्येकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ राजकारण्यांवर आली आहे. या निवडणुकीत पाणी समस्या हाच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात किमान पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना शहरातील काही भागात पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधीपक्ष हे पाणी समस्येवर बोट ठेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक काळात पाणीपुरवठा सुरळीत राहिल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पुन्हा पाणी समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. वांद्रापाडा, कमलाकरनगर, फुलेनगर, नालंदानगर या भागात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना पाणी भरता येत नाही. तर काहींना मोटर लाऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे. जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा वितरणात होत असलेल्या चुकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तर या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक कारणे पुढे केली जातात.

अंबरनाथ पश्चिम भागात पाण्याची तीव्र टंचाई ही पूर्वीपासून होती. मात्र मागील सहा महिन्यात वितरणात सुधारणा करण्यात आल्याने समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या महिन्याभरपाासून पुन्हा ही समस्या उफाळून आली आहे.तर गेल्या दोन दिवसांपासून समस्येत वाढ होताना दिसत आहे. निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या राजकीय नेत्यांना नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात वेळ घालवावा लागत आहे. तर ज्या भागात पाणी येत नाही त्यांची समजूत घालण्यात वेळ जात आहे.

ऐन निवडणुकीच्यावेळी संतापात अधिक भरविरोधी पक्ष या समस्येवर बोट ठेऊन पाणी समस्येलाच आपले निवडणुकीचे मुद्दे करुन प्रचार करत आहेत. आधीच पाण्याच्या समस्येमुळे शहर संतापलेले असताना आता निवडणुकीतही हाच प्रकार घडत असल्याने या संतापात भर पडली आहे.