शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

प्रचारातही पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:38 IST

अंबरनाथमधील चित्र : नागरिकांना होत आहे त्रास, नेत्यांवर तक्रारींचा पाऊस

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच आता शहरातील पाणी समस्येकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ राजकारण्यांवर आली आहे. या निवडणुकीत पाणी समस्या हाच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात किमान पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना शहरातील काही भागात पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधीपक्ष हे पाणी समस्येवर बोट ठेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक काळात पाणीपुरवठा सुरळीत राहिल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पुन्हा पाणी समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. वांद्रापाडा, कमलाकरनगर, फुलेनगर, नालंदानगर या भागात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना पाणी भरता येत नाही. तर काहींना मोटर लाऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे. जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा वितरणात होत असलेल्या चुकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तर या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक कारणे पुढे केली जातात.

अंबरनाथ पश्चिम भागात पाण्याची तीव्र टंचाई ही पूर्वीपासून होती. मात्र मागील सहा महिन्यात वितरणात सुधारणा करण्यात आल्याने समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या महिन्याभरपाासून पुन्हा ही समस्या उफाळून आली आहे.तर गेल्या दोन दिवसांपासून समस्येत वाढ होताना दिसत आहे. निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या राजकीय नेत्यांना नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात वेळ घालवावा लागत आहे. तर ज्या भागात पाणी येत नाही त्यांची समजूत घालण्यात वेळ जात आहे.

ऐन निवडणुकीच्यावेळी संतापात अधिक भरविरोधी पक्ष या समस्येवर बोट ठेऊन पाणी समस्येलाच आपले निवडणुकीचे मुद्दे करुन प्रचार करत आहेत. आधीच पाण्याच्या समस्येमुळे शहर संतापलेले असताना आता निवडणुकीतही हाच प्रकार घडत असल्याने या संतापात भर पडली आहे.