शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

प्रचारातही पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:38 IST

अंबरनाथमधील चित्र : नागरिकांना होत आहे त्रास, नेत्यांवर तक्रारींचा पाऊस

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच आता शहरातील पाणी समस्येकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ राजकारण्यांवर आली आहे. या निवडणुकीत पाणी समस्या हाच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात किमान पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना शहरातील काही भागात पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधीपक्ष हे पाणी समस्येवर बोट ठेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक काळात पाणीपुरवठा सुरळीत राहिल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पुन्हा पाणी समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. वांद्रापाडा, कमलाकरनगर, फुलेनगर, नालंदानगर या भागात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना पाणी भरता येत नाही. तर काहींना मोटर लाऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे. जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा वितरणात होत असलेल्या चुकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तर या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक कारणे पुढे केली जातात.

अंबरनाथ पश्चिम भागात पाण्याची तीव्र टंचाई ही पूर्वीपासून होती. मात्र मागील सहा महिन्यात वितरणात सुधारणा करण्यात आल्याने समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या महिन्याभरपाासून पुन्हा ही समस्या उफाळून आली आहे.तर गेल्या दोन दिवसांपासून समस्येत वाढ होताना दिसत आहे. निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या राजकीय नेत्यांना नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात वेळ घालवावा लागत आहे. तर ज्या भागात पाणी येत नाही त्यांची समजूत घालण्यात वेळ जात आहे.

ऐन निवडणुकीच्यावेळी संतापात अधिक भरविरोधी पक्ष या समस्येवर बोट ठेऊन पाणी समस्येलाच आपले निवडणुकीचे मुद्दे करुन प्रचार करत आहेत. आधीच पाण्याच्या समस्येमुळे शहर संतापलेले असताना आता निवडणुकीतही हाच प्रकार घडत असल्याने या संतापात भर पडली आहे.