शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळू नदीवरील पाणीयोजना बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:16 IST

काही ठिकाणी दूषित पुरवठा : गावांतील जलस्रोतही आटल्याने टंचाईचे सावट

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील काळू नदीतील पाण्याची पातळी घटल्याने नदीपात्र कोरडे पडत चालले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १० ते १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. फळेगाव, आरेली, मढ, रुंदे, म्हस्कळ व गुरवली या गावांना काळू नदीतील पाणी पुरवले जाते. परंतु, यंदाच्या कडक उन्हाळ्यात ओढे, नाले, तलाव, विहिरी आणि बोरवेलही आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ काळू नदीवरच धाव घेत आहेत. परिणामी नदीचे पात्रही कोरडे पडले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून पुरवले जाणारे पाणी गढूळ व अशुद्ध येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच निम्मा जून उलटला तरी मौसमी पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

काळू नदीवर टिटवाळा येथे केटी बंधारा आहे. त्यामुळे तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. केडीएमसीची पाणीयोजना याच पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने महापालिकेने या योजनेतून टिटवाळा शहराला पाणीपुरवठा करणे बंद केले आहे. तर दुसरीकडे बंधाऱ्याचे दरवाजेही लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी काढले आहेत. यामुळे या नदीच्या पात्रात काही प्रमाणात असलेले पाणीही कमी झाले आहे. परिणामी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसला आहे.नदीच्या पाण्यावर लगतच्या गावातील शेतकऱ्यांची गुरे पाणी पिण्यासाठी येतात. परंतु, आता त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर काही प्रमाणावर येथील शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजीपाली पिकवतात. पाण्याअभावी आता त्यांनीही भाजीपाला घेणे बंद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच लघुपाटबंधारे विभागाने बंधाºयाचे दरवाजे काढायला नको होते, असे ग्रामस्थ व शेतकºयांचे म्हणणे आहे.सरकारी नियमानुसार ३१ मेपर्यंत सर्वच बंधारे व धरणांचे दरवाजे उघडणे अथवा काढणे गरजेचे आहे. कारण अचानक पाऊस सुरू झाल्यास हे दरवाजे काढणे शक्य होत नाही. डेडलाइननुसारच आम्ही टिटवाळा येथील काळू नदीवरील केटी बंधाºयाचे दरवाजे काढले आहेत.- धनराज पाटील, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवाटिटवाळा-गुरवलीजवळ काळू नदीवर असणाºया लघुपाटबंधारे विभागाच्या बंधाºयातून टिटवाळा शहर व पाच ते सहा गावांना पाणीयोजनांद्वारे पाणी पुरवले जाते. यंदा पाटबंधारे विभागाने २२ मे रोजी बंधाºयाचे दरवाजे काढल्याने काही प्रमाणात असलेले पाणीही वाहून गेले. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी यांच्याबरोबरच गुरे ढोरे यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- नामदेव मेहेर, ग्रामस्थ, गुरवलीकाळू नदीच्या पाण्यावर आमच्या गावाची योजना अवलंबून आहे. परंतु, सध्या पाणी कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास पाणीयोजना बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील बोरवेल व विहिरीही आटल्या आहेत. पाऊस लांबणीवर पडल्यास गावात पाणीटंचाई जाणवू शकते.- प्रकाश भोईर, ग्रामस्थ, म्हस्कल

टॅग्स :droughtदुष्काळthaneठाणे