शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काळू नदीवरील पाणीयोजना बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:16 IST

काही ठिकाणी दूषित पुरवठा : गावांतील जलस्रोतही आटल्याने टंचाईचे सावट

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील काळू नदीतील पाण्याची पातळी घटल्याने नदीपात्र कोरडे पडत चालले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १० ते १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. फळेगाव, आरेली, मढ, रुंदे, म्हस्कळ व गुरवली या गावांना काळू नदीतील पाणी पुरवले जाते. परंतु, यंदाच्या कडक उन्हाळ्यात ओढे, नाले, तलाव, विहिरी आणि बोरवेलही आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ काळू नदीवरच धाव घेत आहेत. परिणामी नदीचे पात्रही कोरडे पडले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून पुरवले जाणारे पाणी गढूळ व अशुद्ध येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच निम्मा जून उलटला तरी मौसमी पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

काळू नदीवर टिटवाळा येथे केटी बंधारा आहे. त्यामुळे तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. केडीएमसीची पाणीयोजना याच पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने महापालिकेने या योजनेतून टिटवाळा शहराला पाणीपुरवठा करणे बंद केले आहे. तर दुसरीकडे बंधाऱ्याचे दरवाजेही लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी काढले आहेत. यामुळे या नदीच्या पात्रात काही प्रमाणात असलेले पाणीही कमी झाले आहे. परिणामी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसला आहे.नदीच्या पाण्यावर लगतच्या गावातील शेतकऱ्यांची गुरे पाणी पिण्यासाठी येतात. परंतु, आता त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर काही प्रमाणावर येथील शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजीपाली पिकवतात. पाण्याअभावी आता त्यांनीही भाजीपाला घेणे बंद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच लघुपाटबंधारे विभागाने बंधाºयाचे दरवाजे काढायला नको होते, असे ग्रामस्थ व शेतकºयांचे म्हणणे आहे.सरकारी नियमानुसार ३१ मेपर्यंत सर्वच बंधारे व धरणांचे दरवाजे उघडणे अथवा काढणे गरजेचे आहे. कारण अचानक पाऊस सुरू झाल्यास हे दरवाजे काढणे शक्य होत नाही. डेडलाइननुसारच आम्ही टिटवाळा येथील काळू नदीवरील केटी बंधाºयाचे दरवाजे काढले आहेत.- धनराज पाटील, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवाटिटवाळा-गुरवलीजवळ काळू नदीवर असणाºया लघुपाटबंधारे विभागाच्या बंधाºयातून टिटवाळा शहर व पाच ते सहा गावांना पाणीयोजनांद्वारे पाणी पुरवले जाते. यंदा पाटबंधारे विभागाने २२ मे रोजी बंधाºयाचे दरवाजे काढल्याने काही प्रमाणात असलेले पाणीही वाहून गेले. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी यांच्याबरोबरच गुरे ढोरे यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- नामदेव मेहेर, ग्रामस्थ, गुरवलीकाळू नदीच्या पाण्यावर आमच्या गावाची योजना अवलंबून आहे. परंतु, सध्या पाणी कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास पाणीयोजना बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील बोरवेल व विहिरीही आटल्या आहेत. पाऊस लांबणीवर पडल्यास गावात पाणीटंचाई जाणवू शकते.- प्रकाश भोईर, ग्रामस्थ, म्हस्कल

टॅग्स :droughtदुष्काळthaneठाणे