शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

कल्याण-डोंबिवलीतील पाणीदरवाढ फेटाळली, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:12 IST

महापालिका प्रशासन एक हजार लीटर पाण्यासाठी सात रुपये दर आकारते.

कल्याण : केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आलेल्या पाणीदरवाढीच्या प्रस्तावाला सदस्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे ही दरवाढ फेटाळण्यात आल्याने शहरातील नागरिकांना महापालिका निवडणुकीपूर्वी दिलासा मिळाला आहे.महापालिका प्रशासन एक हजार लीटर पाण्यासाठी सात रुपये दर आकारते. त्यात प्रशासनाने तीन रुपयांची वाढ प्रस्तावित केली होती. झोपडीधारकांसाठी १०० ते ९०० रुपये आकारले जातात. त्यांना सरसकट २२५ रुपये आकारण्याचे प्रस्तावित केले होते. तसेच, एका पाण्याच्या टँकरसाठी सध्या ४०० रुपये आकारले जातात. त्यात ३३० रुपयांची वाढ सुचवण्यात आली होती. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला असता शिवसेना सदस्य वामन म्हात्रे यांनी नागरिकांना आपण पुरेसे पाणी देत नाही. पाण्याची चोरी ७० टक्के असून प्लंबर आणि दलालांच्या माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांच्या तोंडचे पाणी चोरटे पळवत आहेत. त्यामुळे ही पाण्याची दरवाढ करू नये, अशी मागणी केली. बिल्डरांना ओपन लॅण्ड टॅक्समध्ये पालिकेने करदरात सूट दिली. त्यांच्याकडून काडीमात्र वसुली न करता सामान्यांना वेठीस धरले जात आहे, असा मुद्दा म्हात्रे यांनी उपस्थित केला.भाजपच्या सदस्य सुनीता पाटील म्हणाल्या की, २७ गावांत वेळेवर पाणी येत नाही. त्यांच्याकडून पाणीबिल वसूल केले जाते. त्याचबरोबर गावातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. २७ गावांतील अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ते कितपत प्रगतीपथावर आहे, असा प्रश्न विचारत पाणीदरवाढीला विरोध केला. शिवसेना सदस्य गोरख जाधव यांनी ‘अ’ प्रभागात पाणीटंचाई आहे. तेथे टँकर पुरवला जात नाही, मग महापालिकेचा ठेकेदार कोणत्या भागात टँकर पुरवतो. महापालिकेकडून तो बिले लाटत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला.टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी श्वेता ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. मागच्या वर्षीच पाणीटँकरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली होती. यंदाही प्रशासनाने त्यात वाढ प्रस्तावित केली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. या पाणीदरात वाढ करण्यास सदस्यांनी तीव्र विरोध केल्याने सभापती विकास म्हात्रे यांनी सदस्यांची मागणी लक्षात घेता दरवाढ फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी मागच्या सभेत मालमत्ताकरात तीन टक्के दरवाढ प्रशासनातर्फे प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढही स्थायीने फेटाळली होती. त्यानंतर, आता पाणीदरवाढ फेटाळली आहे.जलशुद्धीकरणाच्या दुरुस्तीच्या खर्चास मान्यता२०१९ मध्ये पावसाळ्यात जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यावेळी उल्हास नदीला पूर आल्याने महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घुसल्याने दोन-वेळा चार ते पाच दिवस जलशुद्धीकरण केंद्र ठप्प झाले होते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागली होती.हे काम अत्यावश्यक असल्याने पालिकेने मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील बिघडलेली यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी १९ लाख ८२ हजार रुपये खर्च केला होता. या खर्चाला बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत कार्याेत्तर मंजुरी देण्यात आल्याचे सभापती म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका