शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कचऱ्यामुळे होतेय जलप्रदूषण, आधारवाडी डम्पिंग ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:16 IST

कल्याण शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे.

कल्याण : शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे. त्यावरील कचरा आता कल्याण खाडीच्या पाण्यात मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, आता डम्पिंगमुळे जलप्रदूषण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.केडीएमसी हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. हा कचरा ओला व सुका, असे वर्गीकरण न करता सरसकट गोळा करून आधारवाडी डम्पिंगवर टाकला जातो. मात्र, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात नाही. तेथे कचºयाचा किमान २५ मीटर उंच भला मोठा डोंगर तयार झाला आहे. कचरा जास्त असल्याने डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाले असून, कचरा कल्याणच्या खाडीत मिसळत आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. प्लास्टिकच्या कच-याचेही प्रमाणही अधिक असल्याने ते खाडीच्या पाण्यात मिसळत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट नियमावलीनुसार कचरा डम्पिंग ग्राउंड हे पाणथळ जागेपासून दूर असले पाहिजे. या निकषानुसार हे डम्पिंग ग्राउंड बसत नसल्याने ते बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास गेल्या काही वर्षांपूर्वी दिले आहेत. मात्र, पर्यायी घनकचरा शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू झालेले नसल्याने आधारवाडी डम्पिंगवर सुरू केलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेनुसार चालविण्याऐवजी बंद करण्यात आला आहे.महापालिकेने उंबर्डे कचरा प्रकल्प उभारला असून, तेथे कचरा प्रक्रिया सुरू केली असती, तर काही प्रमाणात आधारवाडी डम्पिंगवर पडणारा कचरा कमी झाला असता. मात्र, उंबर्डे प्रकल्पास स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी विरोध केला. प्रकल्प बंदिस्त स्वरूपात करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बंद आहे. दुसरीकडे प्रकल्प बंदिस्त स्वरूपाचा करता येत नाही, तशी तरतूदच उंबर्डे प्रकल्पात नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. त्यामुळे कचरा विभागला जात नाही. प्रत्येक ठिकाणच्या कचºयावर त्या-त्या ठिकाणी प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मात्र, अन्य ठिकाणी प्रकल्प उभारले गेलेले नाहीत.उंबर्डे प्रकल्पाला होतोय विरोधमुख्यमंत्र्यांसोबत ८ जुलैला झालेल्या बैठकीत त्यांनी कचरा प्रकल्पाची डेडलाइन पाळली जात नसल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार रोखा, असे आदेश दिले होते. त्याचबरोबर उंबर्डे प्रकल्प १५ सप्टेंबरपासून सुरू करा आणि बारावे प्रकल्प १५ मार्चला सुरू करा, अशी मुदत दिली होती.मात्र, १५ सप्टेंबरची मुदत हुकली आहे. उंबर्डे प्रकल्प अतिवृष्टीमुळे सुरू करता आला नसल्याची सबब प्रशासनाकडून दिली गेली आहे. आता त्याला नगरसेवकाचा विरोध आहे. उंबर्डे सुरू झाला नसल्याने आधारवाडी शास्त्रोक्तरीत्या बंद होऊ शकत नाही. परिणामी, कचºयाचा डोंगर वाढतच आहे.२० लाख घनमीटर मेट्रीक टन कचराआधारवाडी डम्पिंगची क्षमता किती आहे, असा सवाल घनकचरा व्यवस्थापनास विचारला असता हे डम्पिंग ग्राउंड हे डिझाइन डम्पिंग नाही. त्यामुळे त्याची क्षमता किती व काय असू शकते, हे सांगता येत नाही. २०१५ मध्ये आधारवाडी डम्पिंगवर १५ लाख घनमीटर मेट्रीक टन कच-याचा डोंगर होता. आज त्यात वाढ होऊन त्याठिकाणचा कचरा २० लाख घनमीटर मेट्रीक टन इतका झाला आहे.एमएमआरडीएने केडीएमसी हद्दीतील रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान काम सुरू असले तरी या कामाला आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाच्या डोंगराचा अडसर आले. हा डोंगर दूर करण्यासाठी नुकतीच तीन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. त्यावेळी कचरा दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कचरा पांगून तो खाडीत गेला असावा, अशी सबब घनकचरा विभागाकडून दिली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे