शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यातील गाव-पाड्यांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:45 IST

जानेवारीतच गंभीर परिस्थिती; तहसीलदारांकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर

भातसानगर : शहापूर तालुक्यातील चार गावे आणि आठ पाड्यांत आतापासूनच पाणीटंचाई भेडसावते आहे. या गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यापासूनच पावसाने दिलेल्या गुंगाºयाचे पडसाद सध्या तालुक्यात जाणवत आहेत.मार्च ते एप्रिल महिन्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाई जाणवत असे. यंदा मात्र, काही दिवसांपासूनच दांड,अजनुप, वाशाळा(बु), वाशाळा(खु), या चार गावांच्या बरोबर पारधवाडी, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वरचा गायदरा, सखाराम पाडा, राईची वाडी, चारण वाडी, या गावांमध्ये काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतीने गट विकास अधिकाºयांकडे लेखी मागणी केली आहे.ही मागणी लक्षात घेत गट विकास अधिकारी टी.ओ. चव्हाण यांनी हे प्रस्ताव तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे पाठवल्याची माहिती दिली आहे. या गावपाड्यांना तीन टँकरची गरज असल्याने आता त्यासाठीची तरतूद केव्हा होते या प्रतीक्षेत नागरिक आहेत. या वर्षी तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी तालुक्यात ११२ गाव पाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवली होती. यंदा मात्र हा आकडा वाढणार आहे.तानसा वैतरणा परिसरातील गावांना भातसा नदीतूनच पाणी मिळणार की, तानसा वैतरणा नदीतून या बाबत अजूनही काहीच माहिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. तानसा, वैतरणा या परिसरातील गावांना या धरणातून पाणी भरून दिल्यास त्यासाठीचे ३० किमी. अंतर वाचून गावांना लवकर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाऊ शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.शहापूर तालुक्यातील तीन गावे आणि आठ पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या गावातील ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्या गाव पाड्यांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- रवींद्र बाविस्कर,तहसीलदार, शहापूर

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई