शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

शहापूर तालुक्यातील गाव-पाड्यांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:45 IST

जानेवारीतच गंभीर परिस्थिती; तहसीलदारांकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर

भातसानगर : शहापूर तालुक्यातील चार गावे आणि आठ पाड्यांत आतापासूनच पाणीटंचाई भेडसावते आहे. या गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यापासूनच पावसाने दिलेल्या गुंगाºयाचे पडसाद सध्या तालुक्यात जाणवत आहेत.मार्च ते एप्रिल महिन्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाई जाणवत असे. यंदा मात्र, काही दिवसांपासूनच दांड,अजनुप, वाशाळा(बु), वाशाळा(खु), या चार गावांच्या बरोबर पारधवाडी, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वरचा गायदरा, सखाराम पाडा, राईची वाडी, चारण वाडी, या गावांमध्ये काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतीने गट विकास अधिकाºयांकडे लेखी मागणी केली आहे.ही मागणी लक्षात घेत गट विकास अधिकारी टी.ओ. चव्हाण यांनी हे प्रस्ताव तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे पाठवल्याची माहिती दिली आहे. या गावपाड्यांना तीन टँकरची गरज असल्याने आता त्यासाठीची तरतूद केव्हा होते या प्रतीक्षेत नागरिक आहेत. या वर्षी तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी तालुक्यात ११२ गाव पाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवली होती. यंदा मात्र हा आकडा वाढणार आहे.तानसा वैतरणा परिसरातील गावांना भातसा नदीतूनच पाणी मिळणार की, तानसा वैतरणा नदीतून या बाबत अजूनही काहीच माहिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. तानसा, वैतरणा या परिसरातील गावांना या धरणातून पाणी भरून दिल्यास त्यासाठीचे ३० किमी. अंतर वाचून गावांना लवकर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाऊ शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.शहापूर तालुक्यातील तीन गावे आणि आठ पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या गावातील ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्या गाव पाड्यांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- रवींद्र बाविस्कर,तहसीलदार, शहापूर

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई