शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:19 IST

सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे.

डोंबिवली : सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. शिवमंदिर पथ, श्रीखंडेवाडी आदी परिसरातील सात सोसायट्यांमधील मीटर आता चोरीला गेली आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत एफआयआर दाखल होऊनही चोरट्यांचा छडा लागलेला नाही. एकीकडे पोलिसांची उदासीनता दिसत असताना दुसरीकडे मात्र तक्रारदार असलेल्या सोसायटींमधील रहिवाशांची परवड होत आहे.काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ येथील सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले होते. पश्चिमेतील काही भागांमध्येही या चोरीच्या घटना घडल्या होत्या. एप्रिलपर्यंत २५३ मीटर चोरीला गेली होती. आजही या चोरीचे सत्र सुरूच असल्याने ही संख्या आता ३०० च्या आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये पूर्वेकडील श्रीखंडेवाडी, रघुवीरनगर, शिवमंदिर पथ, संगीतावाडी या भागांमधील सात सोसायट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मीटर चोरीमुळे सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. तर, मीटर चोरीला जात असल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी सोसायट्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना पाहता संगीतावाडी, रघुवीरनगर रहिवाशी संघातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. शहरात मीटर चोरीच्या घटना सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.>मीटरची चोरी भंगार विक्रीसाठीचोरलेले मीटर अन्यत्र वापरता येत नाही. मीटर पितळ धातूचे आहे. पितळ्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे त्याची भंगारामध्ये विक्री करत असावेत, असा कयास मांडला जात आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.>चोरांचा छडा लागणे गरजेचेमीटर चोरीच्याघटनांमध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. मीटर चोरून नेली जात असल्याने पाणीपुरवठाही खंडित होतो. पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. रघुवीरनगर, संगीतावाडी प्रभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद होत असताना चोरांचा छडा लागणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी सागर घोणे आणि सौरभ नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.