शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:19 IST

सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे.

डोंबिवली : सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. शिवमंदिर पथ, श्रीखंडेवाडी आदी परिसरातील सात सोसायट्यांमधील मीटर आता चोरीला गेली आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत एफआयआर दाखल होऊनही चोरट्यांचा छडा लागलेला नाही. एकीकडे पोलिसांची उदासीनता दिसत असताना दुसरीकडे मात्र तक्रारदार असलेल्या सोसायटींमधील रहिवाशांची परवड होत आहे.काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ येथील सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले होते. पश्चिमेतील काही भागांमध्येही या चोरीच्या घटना घडल्या होत्या. एप्रिलपर्यंत २५३ मीटर चोरीला गेली होती. आजही या चोरीचे सत्र सुरूच असल्याने ही संख्या आता ३०० च्या आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये पूर्वेकडील श्रीखंडेवाडी, रघुवीरनगर, शिवमंदिर पथ, संगीतावाडी या भागांमधील सात सोसायट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मीटर चोरीमुळे सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. तर, मीटर चोरीला जात असल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी सोसायट्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना पाहता संगीतावाडी, रघुवीरनगर रहिवाशी संघातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. शहरात मीटर चोरीच्या घटना सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.>मीटरची चोरी भंगार विक्रीसाठीचोरलेले मीटर अन्यत्र वापरता येत नाही. मीटर पितळ धातूचे आहे. पितळ्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे त्याची भंगारामध्ये विक्री करत असावेत, असा कयास मांडला जात आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.>चोरांचा छडा लागणे गरजेचेमीटर चोरीच्याघटनांमध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. मीटर चोरून नेली जात असल्याने पाणीपुरवठाही खंडित होतो. पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. रघुवीरनगर, संगीतावाडी प्रभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद होत असताना चोरांचा छडा लागणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी सागर घोणे आणि सौरभ नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.