शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:19 IST

सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे.

डोंबिवली : सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. शिवमंदिर पथ, श्रीखंडेवाडी आदी परिसरातील सात सोसायट्यांमधील मीटर आता चोरीला गेली आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत एफआयआर दाखल होऊनही चोरट्यांचा छडा लागलेला नाही. एकीकडे पोलिसांची उदासीनता दिसत असताना दुसरीकडे मात्र तक्रारदार असलेल्या सोसायटींमधील रहिवाशांची परवड होत आहे.काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ येथील सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले होते. पश्चिमेतील काही भागांमध्येही या चोरीच्या घटना घडल्या होत्या. एप्रिलपर्यंत २५३ मीटर चोरीला गेली होती. आजही या चोरीचे सत्र सुरूच असल्याने ही संख्या आता ३०० च्या आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये पूर्वेकडील श्रीखंडेवाडी, रघुवीरनगर, शिवमंदिर पथ, संगीतावाडी या भागांमधील सात सोसायट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मीटर चोरीमुळे सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. तर, मीटर चोरीला जात असल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी सोसायट्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना पाहता संगीतावाडी, रघुवीरनगर रहिवाशी संघातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. शहरात मीटर चोरीच्या घटना सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.>मीटरची चोरी भंगार विक्रीसाठीचोरलेले मीटर अन्यत्र वापरता येत नाही. मीटर पितळ धातूचे आहे. पितळ्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे त्याची भंगारामध्ये विक्री करत असावेत, असा कयास मांडला जात आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.>चोरांचा छडा लागणे गरजेचेमीटर चोरीच्याघटनांमध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. मीटर चोरून नेली जात असल्याने पाणीपुरवठाही खंडित होतो. पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. रघुवीरनगर, संगीतावाडी प्रभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद होत असताना चोरांचा छडा लागणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी सागर घोणे आणि सौरभ नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.