शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

टिटवाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:16 IST

लाखो लीटर वाया : पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईची भीती, नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

टिटवाळा : यंदा अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. टिटवाळ्याजवळच्या काळू नदीवर केटी बंधारा असून येथून मोहिली उदंचन केंद्रामार्फत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. मांडा-टिटवाळ्यात मात्र अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. ही गळती न रोखल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

टिटवाळा पूर्वेकडील सुमुख सोसायटी, दळवी वाडा, हरिओम व्हॅली, गणेशनगर सोसायटी, निमकरनाका, मातादी मंदिर टेकडी परिसर, गणपती मंदिर परिसर, महागणपती हॉस्पिटलजवळ, जावईपाडा, नांदप रोड, इंदिरानगर, तर पश्चिमेतील वासुंद्री रोडवर असलेल्या दर्यायी महाल, पंचवटी चौक, तुलसी व्हीला सोसायटी परिसर आदी ठिकाणी जागोजागी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद कानेटकर यांनी इशारा दिला आहे.महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली येथील १०० एमएलडी या उदंचन केंद्रातून आणि टिटवाळा येथील पाणीपुरवठा योजनेतून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहिली, उभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी आणि आंबिवली या परिसरांत पाणी शुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पालिका प्रशासनाकडून केला जातो. टिटवाळा येथे काळू नदीवर पाच दशलक्ष क्षमतेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. टिटवाळा-गुरवलीजवळ कोल्हापूर धर्तीच्या बंधाºयाच्या पाणीसाठ्यावर ही पाणीयोजना सुरू करण्यात आली. या पंपहाउसमधून टिटवाळा गाव, म्हस्कळ रोड, गोवेली रोड परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या परिसरासाठी २५ व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठ होत असून त्यातून गळती होत आहे. गेल्या वर्षी काळू नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने टिटवाळा पाणीयोजनेतून पाणीपुरवठा बंद करून मोहिली उदंचन केंद्रातून सुरू करण्यात आला. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या निर्माण झाली होती. अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने होणारी पाणीगळती दुरु स्त करावी, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांतून ठिकठिकाणी होत असलेली गळती तातडीने थांबवण्यात येईल. तसे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा, ‘अ’ प्रभाग क्षेत्रमोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. बेकायदा जोडण्यांमुळे हा प्रकार सुरू असून पालिका प्रशासनाच्या कर्मचाºयांकडून त्याला पाठीशी घातले जात आहे.- अशोक डोंगरे, रहिवासी, टिटवाळा 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी