शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

टिटवाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:16 IST

लाखो लीटर वाया : पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईची भीती, नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

टिटवाळा : यंदा अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. टिटवाळ्याजवळच्या काळू नदीवर केटी बंधारा असून येथून मोहिली उदंचन केंद्रामार्फत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. मांडा-टिटवाळ्यात मात्र अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. ही गळती न रोखल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

टिटवाळा पूर्वेकडील सुमुख सोसायटी, दळवी वाडा, हरिओम व्हॅली, गणेशनगर सोसायटी, निमकरनाका, मातादी मंदिर टेकडी परिसर, गणपती मंदिर परिसर, महागणपती हॉस्पिटलजवळ, जावईपाडा, नांदप रोड, इंदिरानगर, तर पश्चिमेतील वासुंद्री रोडवर असलेल्या दर्यायी महाल, पंचवटी चौक, तुलसी व्हीला सोसायटी परिसर आदी ठिकाणी जागोजागी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद कानेटकर यांनी इशारा दिला आहे.महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली येथील १०० एमएलडी या उदंचन केंद्रातून आणि टिटवाळा येथील पाणीपुरवठा योजनेतून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहिली, उभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी आणि आंबिवली या परिसरांत पाणी शुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पालिका प्रशासनाकडून केला जातो. टिटवाळा येथे काळू नदीवर पाच दशलक्ष क्षमतेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. टिटवाळा-गुरवलीजवळ कोल्हापूर धर्तीच्या बंधाºयाच्या पाणीसाठ्यावर ही पाणीयोजना सुरू करण्यात आली. या पंपहाउसमधून टिटवाळा गाव, म्हस्कळ रोड, गोवेली रोड परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या परिसरासाठी २५ व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठ होत असून त्यातून गळती होत आहे. गेल्या वर्षी काळू नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने टिटवाळा पाणीयोजनेतून पाणीपुरवठा बंद करून मोहिली उदंचन केंद्रातून सुरू करण्यात आला. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या निर्माण झाली होती. अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने होणारी पाणीगळती दुरु स्त करावी, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांतून ठिकठिकाणी होत असलेली गळती तातडीने थांबवण्यात येईल. तसे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा, ‘अ’ प्रभाग क्षेत्रमोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. बेकायदा जोडण्यांमुळे हा प्रकार सुरू असून पालिका प्रशासनाच्या कर्मचाºयांकडून त्याला पाठीशी घातले जात आहे.- अशोक डोंगरे, रहिवासी, टिटवाळा 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी