शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 05:42 IST

धरणांतील पाणीसाठा घटला : प्रशासनाच्या हालचाली सुरू; १४ ते १५ टक्के कपातीची शक्यता

सुरेश लोखंडे

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला कमी पाऊस आणि धरणात कमी झालेला साठा, यामुळे ऐन नवरात्री आणि दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू असून पुढील आठवड्यात पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे १४ टक्के पाणीकपात लागू केली होती. फेब्रुवारीत ती कमी करून सात टक्के केली. त्यानंतर, एप्रिल-मेपासून कपात रद्द केली; पण उल्हासनगर महापालिकेने आताचा पावसाळा संपला, तरी एक दिवसाची पाणीकपात कायम ठेवून वेठीस धरले. उल्हासनगरच्या बहुतांश भागात शुक्रवारी दिवसभर पाणी सोडले जात नाही. महापालिकेच्या या मनमानीची झळ वर्षभरापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. यावेळीही सक्तीच्या पाणीकपातीला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हाभरात सुमारे १४ ते १५ टक्के सक्तीच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.यंदा सरासरी दोन हजार ५१७.९१ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी तीन हजार ३४३.३४ मिमी पडला होता. मागील वर्षी परतीचा पाऊस जोरदार होता. ओखी चक्रीवादळाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाकडूनही उपेक्षाच होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन दिवसांत परतीचा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यामुळे धरण भरण्याची शक्यता नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून १४ ते १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीकपात लागू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.धरणातील पाणीसाठाशंभर टक्के भरलेल्या बारवी धरणात आता २२६.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या धरणात मागील वर्षी १०० टक्के म्हणजे २३३.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तरीदेखील १४ टक्के पाणीकपात लागू केली होती.त्यावेळी धरणाखालील पाणी उचलण्यात येत होते. आता मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. यामुळेही साठा झपाट्याने कमी झाला आहे.उल्हास नदीच्या आंध्रा धरणातही ३२४.२२ दशलक्ष घनमीटर (९५.६० टक्के) साठा आहे. या तुलनेत मागील वर्षी तो ३३७.३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९९.४८ टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात लागू केली होती.आता सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे यंदा लवकर कपात लागू करून १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.च्मुंबईसह ठाणे महापालिकेलापाणीपुरवठाकरणाऱ्या भातसाधरणातम्हणजे८८५.८६दशलक्ष घनमीटरपाणीसाठा आहे. याधरणात मागील वर्षी ९३७.४० दशलक्ष घनमीटर (९९.५० टक्के) पाणीसाठा होता.च्यंदा या धरणात केवळ सरासरी २०६४ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी ३२०३ मिमी म्हणजे यंदाच्या तुलनेत सरासरी एक हजार १३९ मिमी जादा पाऊस पडला होता.च्याप्रमाणेच ठाणे शहराच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरण व उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका