शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 05:42 IST

धरणांतील पाणीसाठा घटला : प्रशासनाच्या हालचाली सुरू; १४ ते १५ टक्के कपातीची शक्यता

सुरेश लोखंडे

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला कमी पाऊस आणि धरणात कमी झालेला साठा, यामुळे ऐन नवरात्री आणि दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू असून पुढील आठवड्यात पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे १४ टक्के पाणीकपात लागू केली होती. फेब्रुवारीत ती कमी करून सात टक्के केली. त्यानंतर, एप्रिल-मेपासून कपात रद्द केली; पण उल्हासनगर महापालिकेने आताचा पावसाळा संपला, तरी एक दिवसाची पाणीकपात कायम ठेवून वेठीस धरले. उल्हासनगरच्या बहुतांश भागात शुक्रवारी दिवसभर पाणी सोडले जात नाही. महापालिकेच्या या मनमानीची झळ वर्षभरापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. यावेळीही सक्तीच्या पाणीकपातीला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हाभरात सुमारे १४ ते १५ टक्के सक्तीच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.यंदा सरासरी दोन हजार ५१७.९१ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी तीन हजार ३४३.३४ मिमी पडला होता. मागील वर्षी परतीचा पाऊस जोरदार होता. ओखी चक्रीवादळाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाकडूनही उपेक्षाच होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन दिवसांत परतीचा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यामुळे धरण भरण्याची शक्यता नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून १४ ते १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीकपात लागू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.धरणातील पाणीसाठाशंभर टक्के भरलेल्या बारवी धरणात आता २२६.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या धरणात मागील वर्षी १०० टक्के म्हणजे २३३.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तरीदेखील १४ टक्के पाणीकपात लागू केली होती.त्यावेळी धरणाखालील पाणी उचलण्यात येत होते. आता मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. यामुळेही साठा झपाट्याने कमी झाला आहे.उल्हास नदीच्या आंध्रा धरणातही ३२४.२२ दशलक्ष घनमीटर (९५.६० टक्के) साठा आहे. या तुलनेत मागील वर्षी तो ३३७.३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९९.४८ टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात लागू केली होती.आता सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे यंदा लवकर कपात लागू करून १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.च्मुंबईसह ठाणे महापालिकेलापाणीपुरवठाकरणाऱ्या भातसाधरणातम्हणजे८८५.८६दशलक्ष घनमीटरपाणीसाठा आहे. याधरणात मागील वर्षी ९३७.४० दशलक्ष घनमीटर (९९.५० टक्के) पाणीसाठा होता.च्यंदा या धरणात केवळ सरासरी २०६४ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी ३२०३ मिमी म्हणजे यंदाच्या तुलनेत सरासरी एक हजार १३९ मिमी जादा पाऊस पडला होता.च्याप्रमाणेच ठाणे शहराच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरण व उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका