शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

उल्हासनगरवासीयांची पाण्यासाठी वणवण; तीन दिवस पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:00 IST

शहराच्या पूर्वेला सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहराच्या पूर्वेला सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली. नादुरूस्त जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाला.उल्हासनगर महापालिकेचे स्वत:चा पाणी पुरवठा स्त्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे कारण पुढे करून, गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद केला; मात्र पुर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने, शनिवारी सलग तीसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी पुरवठा झाला नाही. शुक्रवारी आणि शनिवारी पूर्ण दिवस, तर गुरूवारी व रविवारी अर्धा दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने, रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रविवारी सायंकाळपासून पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.पूर्वेतील नागरिकांनी पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीकडे मोर्चा वळविला. गोरगरीब व सामान्य नागरिकांनी पिण्यास अयोग्य असलेले बोअरवेलचे पाणी उकळून वापरले. अनेक बोअरवेल, हातपंप बंद असल्याने, महिलांसह लहान मुले पाण्यासाठी भटकताना दिसली.काही भागात टँकरने पाणी पुरवठा झाला, तर सोसायट्यांमधील नागरिकांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन गरज भागवली. सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी, अनेक भागात अद्यापही पाणी पुरवठा झाला नाही. सुभाष टेकडी परिसरात लोकांवर पाण्यासाठी बोअरवेल व हातपंपासमोर रांग लावण्याची वेळ आल्याची माहिती नगरसेवक प्रमोद टाले यांनी दिली.कार्यालय निर्मनुष्यनेताजी गार्डन येथील उपअभियंता पाणी पुरवठा व प्रभाग समिती क्रमांक ४ च्या कार्यालयाला सोमवारी दुपारी काही समाजसेवकांसह महिला, नागरिकांनी भेट दिली. त्यावेळी दोन्ही कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. मात्र कार्यालयातील फॅन, लाइट सुरू असल्याची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :Waterपाणी