शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना म्हणजे प्रथमोपचार : निवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:57 IST

सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पनिवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी गुंफले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना हा कायमस्वरूपी उपाय नसून प्रथमोपचार आहे - सुरेश पाटीलछत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेसुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प 

ठाणे : महाराष्ट्रातील पाचशे धरणे साफ करवून त्यातील गाळ काढून शेतात टाकला तर हे काळे सोने शेतकऱ्याचे उपन्न दुप्पट तिप्पट इतके वाढवू शकते. तसेच सगळ्या धरणांमधील गाळ निघाल्याने पाणी साठा आपोआप वाहून दुष्काळावर मात करणे सोपे होईल. पाण्यासाठी केला जाणारा जलयुक्त शिवार योजना हा कायमस्वरूपी उपाय नसून प्रथमोपचार आहे असे मत निवृत्त लेफ़्टनंट कर्नल व ग्रीन थम संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.  सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प निवृत्त लष्करी सैनिकांचे सामाजिक योगदान व १९७१ साली लढाईचे अनुभव या विषयावरील व्याख्यानाने  श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले.

यावेळी सुरेश पाटील यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाण्यासाठी भांडणे होतच आहेत. तशीच भांडणे राज्याराज्यात आणि गावागावांमध्ये देखील होत आहे. तरीही  गेल्या अडुसष्ठ वर्षात राज्यातील जुन्या धरणातील गाळ काढण्याच्या कामाला कोणीही हात घातलेला नाही. महात्मा फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा खडकवासला हे धारण बांधले तेव्हा त्याची क्षमता ही ४ टीएमसी होती. इतक्या वर्षात यातील गाळ न काढल्याने आत्ता या धरणाची पाणी क्षमता ही फक्त पावणेदोन टीएमसी इतकीच उरली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पाणीसमस्या निर्माण होत आहे. निवृत्त झाल्यावर आमच्या ग्रीन थम या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पंधरा लाख ट्रक गाळ काढण्यात आला असून यामुळे धरणामध्ये शून्य पूर्णांक वीस टीएमसी पाणी क्षमता वाढली आहे. काढलेला हा गाळ म्हणजेच काळे सोने शेतीला खत म्हणून घातल्यास शेतीचे उत्पन्न तर वाढेलच पण युरियाची शेतकऱ्याला द्याव्या लागणाऱ्या सरकारी सबसिडीचे कोट्यवधी रुपये वाचतील. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे असून त्यासाठी सरकारचे आर्थिक पाठबळदेखील गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. युद्धातील आठवणीविषयी बोलताना ते म्हणाले युद्ध करणे सोपे असते. युद्ध होऊ न देण्यासाठी खूप सय्यम लागतो. हल्ली सर्जिकल स्ट्राईक वर बोलले जात आहे मात्र सीमेवर असताना आम्हाला नेहमीच सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो मात्र त्याच्या बातम्या केल्या जात नाहीत. आपल्याला कितीही वाटत असले तरी सध्याच्या परिस्थितीत आपण चीनचे काहीही बिघडवू शकत नाही. आठ दिवसाचे झालेले युद्ध आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला झेपणारे नाही. अलीकडे अनेक नेते सरळ बोलून मोकळे होतात पाकिस्तानको उडा देंगे. मात्र तुम्हाला बोलायला काय जाते. तुम्ही वर बसलेले असता. आमची जावन पोरे उडणार आहेत त्यामध्ये याचा विचार केला जात नाही. ह्या सैनिकांच्या जाण्याने त्यांच्या आया आणि विधवांवर झोपडपट्ट्यामध्ये राहण्याची वेळ येते, याचा विचार कोणीही करत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकDamधरण