शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:58 IST

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात अपयश आलेले असतानाच पाण्याच्या नियोजनातील आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी ही कपात लागू करून अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुरू झाली आहे. ही कपात १५ जुलैपर्यंत म्हणजे साडेसहा महिने राहणार आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून १ जानेवारीपासून ही पाणीकपात होईल. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदी पात्रातून पाणी उचलते. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बारवी व आंध्र धरणात मुबलक पाणीसाठा आहे. तरीही कपात लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ३४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना एमआयडीसी दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवते. एमआयडीसीही उल्हास नदीतून पाणी उचलते. त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने २७ गावांना किती पाणी कपात लागू असेल, ते अजून स्पष्ट झालेले नाही.>ठाण्यात पाण्याचे मीटरठाणे : ठाणे शहरातील पाण्याची गळती रोखम्यासाठी जलवाहिन्या बदलण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. पण त्यांच्या देखभालीच्या अटी आणि प्रत्येक जोडणीवर बसवले जाणारे मीटर हे नियम पाहून त्याला कोणत्याच कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट मिटरिंग योजना गुंडाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्याऐवजी ठाणेकरांना दिल्या जाणाºया पाण्याची मोजणी करण्यासाठी मीटर लावले जाणार आहे. या मीटरचे प्रत्येकी आठ ते दहा हजार रूपये ठाणेकरांच्या पाणी बिलांतून तीन टप्प्यांत वसूल केले जाणार होते. नव्या प्रस्तावात तो भुर्दंड ठाणेकरांवर न टाकण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.>सर्वांनाच फटकाउल्हास नदीपात्रातून ४८ लाख नागरिकांची तहान भागविली जाते. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका, २७ गावे, ठाण्याचा काही भाग, कळवा, मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबईच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने होणाºया या कपातीचा फटका या सगळ््यांना बसणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका