शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:58 IST

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात अपयश आलेले असतानाच पाण्याच्या नियोजनातील आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी ही कपात लागू करून अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुरू झाली आहे. ही कपात १५ जुलैपर्यंत म्हणजे साडेसहा महिने राहणार आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून १ जानेवारीपासून ही पाणीकपात होईल. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदी पात्रातून पाणी उचलते. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बारवी व आंध्र धरणात मुबलक पाणीसाठा आहे. तरीही कपात लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ३४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना एमआयडीसी दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवते. एमआयडीसीही उल्हास नदीतून पाणी उचलते. त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने २७ गावांना किती पाणी कपात लागू असेल, ते अजून स्पष्ट झालेले नाही.>ठाण्यात पाण्याचे मीटरठाणे : ठाणे शहरातील पाण्याची गळती रोखम्यासाठी जलवाहिन्या बदलण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. पण त्यांच्या देखभालीच्या अटी आणि प्रत्येक जोडणीवर बसवले जाणारे मीटर हे नियम पाहून त्याला कोणत्याच कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट मिटरिंग योजना गुंडाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्याऐवजी ठाणेकरांना दिल्या जाणाºया पाण्याची मोजणी करण्यासाठी मीटर लावले जाणार आहे. या मीटरचे प्रत्येकी आठ ते दहा हजार रूपये ठाणेकरांच्या पाणी बिलांतून तीन टप्प्यांत वसूल केले जाणार होते. नव्या प्रस्तावात तो भुर्दंड ठाणेकरांवर न टाकण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.>सर्वांनाच फटकाउल्हास नदीपात्रातून ४८ लाख नागरिकांची तहान भागविली जाते. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका, २७ गावे, ठाण्याचा काही भाग, कळवा, मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबईच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने होणाºया या कपातीचा फटका या सगळ््यांना बसणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका