शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:58 IST

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे.

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात अपयश आलेले असतानाच पाण्याच्या नियोजनातील आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी ही कपात लागू करून अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुरू झाली आहे. ही कपात १५ जुलैपर्यंत म्हणजे साडेसहा महिने राहणार आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून १ जानेवारीपासून ही पाणीकपात होईल. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदी पात्रातून पाणी उचलते. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बारवी व आंध्र धरणात मुबलक पाणीसाठा आहे. तरीही कपात लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ३४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना एमआयडीसी दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवते. एमआयडीसीही उल्हास नदीतून पाणी उचलते. त्यामुळे त्यांना आणि पर्यायाने २७ गावांना किती पाणी कपात लागू असेल, ते अजून स्पष्ट झालेले नाही.>ठाण्यात पाण्याचे मीटरठाणे : ठाणे शहरातील पाण्याची गळती रोखम्यासाठी जलवाहिन्या बदलण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. पण त्यांच्या देखभालीच्या अटी आणि प्रत्येक जोडणीवर बसवले जाणारे मीटर हे नियम पाहून त्याला कोणत्याच कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट मिटरिंग योजना गुंडाळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्याऐवजी ठाणेकरांना दिल्या जाणाºया पाण्याची मोजणी करण्यासाठी मीटर लावले जाणार आहे. या मीटरचे प्रत्येकी आठ ते दहा हजार रूपये ठाणेकरांच्या पाणी बिलांतून तीन टप्प्यांत वसूल केले जाणार होते. नव्या प्रस्तावात तो भुर्दंड ठाणेकरांवर न टाकण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.>सर्वांनाच फटकाउल्हास नदीपात्रातून ४८ लाख नागरिकांची तहान भागविली जाते. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका, २७ गावे, ठाण्याचा काही भाग, कळवा, मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबईच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने होणाºया या कपातीचा फटका या सगळ््यांना बसणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका