शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी

By अजित मांडके | Updated: January 2, 2023 13:51 IST

ठाणे महानगर पालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे.

अजित मांडके, ठाणे: नवीन गटात गेलेल्या नगरसेवकांवर मेहेरनजर म्हणून एकदा पूर्ण झालेल्या तसेच सुस्थितीत असलेल्या कळवा, मुंब्रा येथील नागरी कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी ठाणे महानगर पालिकेकडून केली जात असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड यांनी उघडकीस आणला आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे.

एकीकडे ठाणे महानगर पालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत दयनिय असल्याचे वृत्त अनेकदा प्रसारीत करण्यात येत असतानाच ठाणे महानगर पालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. या कामांमध्ये, कळव्यातील इंदिरा नगर पादचारीपुल ते रामेश्वर सोसायटी या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यासाठी ३ कोटी रुपये; खारीगाव रेल्वेफाटक ते सर्व्हेक्षर बिल्डींग या रस्त्याचे युटीडब्ल्यूटी पद्धतीने काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी ६० लाख; स्वामी समर्थ मठ ते ओंकार सोसायटी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ६.५० कोटी;  आरजी २२ ते रघुकूल सोसायटीमधील मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २.५० कोटी;  केशव हाईट्स ते रिलायन्स पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी; मुंब्रा प्रभाग समितीमधील रेतीबंदर स्मशानभूमी रस्ता तयार करण्यासाठी १ कोटी १७ लाख आणि ओऍसीस आर्केड येथील रस्त्यासाठी ५९ लाखांची तजवीज करुन या कामांचे वाटपही करण्यात आलेले आहे. 

विशेष म्हणजे, आधीच ही सर्व कामे पूर्ण झाली असून हे सर्व रस्ते सुस्थितीमध्ये आहेत. या रस्त्यांच्या कामांची हमीदेखील घेतली जात आहे. असे असतानाही नव्याने स्थापन झालेल्या गटात सहभागी झालेल्या नगरसेवकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ठाणेकरांच्या करातून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य ठाणेकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे