शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

By admin | Updated: May 11, 2015 01:26 IST

यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

उमेश जाधव, टिटवाळायंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नसराईत वर-वधुच्या हळदी समारंभ व मिरवणुकीत रात्रभर व दिवसा उन्हात डिजेच्या व बॅण्डच्या तालावर ताल धरत बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचे चित्र कल्याणच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पहावयास मिळते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणातील बदलत्या उष्माघातावर मात करत वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नृत्य करून हाळदी व लग्न समारंभाचा आनंद लुटत आहेत.लग्नसमारंभ म्हटलं की वधु- वराकडच्या मंडळींची मोठी धावपळ सुरू आसते. यंदा लग्नकार्यासाठी मार्च महिन्यात फक्त ५ , एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १० आणि जून महिन्यात अवघे ६ मुहूर्त आहेत, तेसुद्धा १२ जूनपर्यंत. पुढे १७ जूनपासून अधिक मास सुरू होत आहे. तेव्हा मार्च मिहना वगळता येत्या तीन महिन्यांत लग्नकार्यासाठी फक्त २० मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. अशा लग्न व हळदीसमारंभा करिता नातेवाईक अर्थात वऱ्हाडी आणि स्नेही हे आवर्जून आपली हजेरी लावत असतात. त्यामुळे हळदी व लग्नकार्यात आनंदाला उधाण आलेले असते. लग्नकार्यात इतर सर्व धार्मिक विधींसह हळदी समारंभाला विशेष महत्त्व असते. यावेळी रात्रभर डिजे व बँण्डच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद लुटणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळते.दुपारी १२ वाजेनंतरचा उन्हाचा तडाखा तर सहनच होत नाही. असे असले तरी कल्याणशहरासह ग्रामीण व संपूर्ण जिल्हयÞात अशा वातावरणात देखील गावागावात व शहरात सोसायटींमध्ये रोज शेकडो लग्न सोहळे साजरे होत आहेत या सोहळ्याच्या हाळदी समारंभात घामाघुम होऊन नाचणारी वऱ्हाडी पहावयास मिळते. या वऱ्हाडींपुढे तापमानाचाही पारा फिका पडला आहे की काय, अशी शंका निर्माण होते.