शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 03:03 IST

तुर्भेत रविवारी लोकार्पण : सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च

नवी मुंबई : तुर्भे येथील रेल्वे रुळावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या निधीतून रेल्वेप्रशासनाने हा पूल बांधला असून, त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च आला आहे. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांकडून रूळ ओलांडण्याच्या होत असलेल्या प्रयत्नात होणारे अपघात थांबणार आहेत.

ट्रान्सहार्बर रेल्वेमार्ग व ठाणे-बेलापूर मार्ग झाल्यापासून जनता मार्केट व तुर्भे नाका परिसर विभागला गेला आहे. या दोन्ही विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांकडून रस्ता तसेच रूळ ओलांडला जात होता. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पूल उभारून रस्ता ओलांडणाºया प्रवाशांची गैरसोय दूर केली होती; परंतु रेल्वेरुळावर पूल नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा मृत्यूच्या दाढेखालून प्रवास सुरूच होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पूल वाढवून तो रेल्वेरुळावरून जनता मार्केटला जोडावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविका बेबी पाटील यांनी रेल्वे प्रशासनासह पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील यांनीही सदर मागणीवर जोर दिला होता. त्यानुसार खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे प्रशासनाला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती; परंतु केवळ रेल्वे प्रवाशांसाठीच पादचारी पूल अथवा भुयारीमार्ग बांधण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत होते, यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ ओलांडावा लागत होता. याकरिता त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भिंतीलाही भगदाड पाडण्यात आलेले आहे. अखेर पादचारी पुलासाठी लागणारा खर्च देण्याची पालिकेने तयारी दर्शवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तर आमदार संदीप नाईक यांनीही अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडून त्या ठिकाणी पादचारी पूल आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.जुलै २०१७ मध्ये पालिकेने रेल्वे प्रशासनाला सहा कोटी ८४ लाख रुपयांच्या निधी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेने पूलाच्या कामाला सुरुवात केली. त्यातही अनेक अडथळे आल्यानंतर अखेर रविवारी त्याचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, निशांत पाटील आदी उपस्थित होते.पालिकेने हटवले झेंडेपुलाच्या कामाच्या श्रेयवादात सुरू असलेल्या चढाओढीतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर शिवसेनेचे झेंडे लावले होते. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला असता एपीएमसी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पालिकेने सदर झेंडे हटवल्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्येच पुलाचे उद्घाटन उरकण्यात आले.खासदारांची उद्घाटनाची वेळ साधलीऐरोली येथील पालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनावेळी शिवसेना व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. खासदार राजन विचारे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने राष्टÑवादीने उद्घाटन उरकल्याने हा प्रकार घडला होता.तुर्भेतील पादचारी पुलाच्या उद्घाटनापूर्वीही श्रेयवादातून राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना असे वातावरण रंगले होते. त्यामुळे या कार्यक्रमास खासदार विचारे वेळेवर पोहोचतील का? याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.तर नियोजित वेळेनुसार महापौरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याच्या तयारीत प्रशासन व सत्ताधारी होते. नेमके त्याच वेळी वाहतूककोंडीत अडकलेली गाडी सोडून खासदार विचारे यांनी पायी चालत येऊन उद्घाटनाची वेळ साधली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMember of parliamentखासदार