शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

वालधुनी पूल झाला बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:25 IST

तडे गेले : लोखंडी सळया पडल्या उघड्या; वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे

कल्याण : उल्हासनगर-कल्याण रस्त्यावर वालधुनी नदीवर असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच पुलाच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या पुलाची देखभाल दुरुस्ती वेळीच न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण-बदलापूर मार्गावर वालधुनीनजीक कल्याण व उल्हासनगरच्या हद्दीवर वालधुनी नदीवर हा पूल आहे. येथील जुना पूल अरुंद आणि धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. केवळ नवीन पुलावरून वाहतूक होत असल्याने त्यावर वाहतुकीचा ताण पडत येत आहे. त्यामुळे या पुलावरील काँक्रिट उखडले गेले आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.

कल्याण-बदलापूर रस्त्याने पुढे कर्जत, पुणे, मुरबाडकडे जाता येते. त्यामुळे तेथे जाणारी वाहने याच पुलावरून जातात. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे वाहतुकीचा ताण कल्याणवर आला आहे. त्यात पत्रीपूल बंद केला असून, तो पाडला जाणार आहे. वालधुनी पुलावरूनही अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. त्याचा फटका उल्हासनगरच्या हद्दीत पाहायला मिळतो.सध्या सुरू असलेल्या पुलाची अवस्था बिकट असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पुलाचे बांधकाम २००४ मध्ये झाले आहे. जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद आहे. मात्र, तो सुरू असल्यापासूनच नवीन पुलावर वाहने उभी केली जातात.सा.बां. विभागाकडून पुलाच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्षच्जुना पूल सुरू असल्यापासूनच नव्या पुलावर अवजड ट्रक आणि खाजगी बस उभ्या करून ठेवल्या जातात, याकडे आरटीओ कार्यालय व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उल्हासनगर शाखेच्या अखत्यारित येतो. या खात्याकडून पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक व वाहनचालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा