शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

वालधुनी पूल झाला बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:25 IST

तडे गेले : लोखंडी सळया पडल्या उघड्या; वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे

कल्याण : उल्हासनगर-कल्याण रस्त्यावर वालधुनी नदीवर असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच पुलाच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या पुलाची देखभाल दुरुस्ती वेळीच न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण-बदलापूर मार्गावर वालधुनीनजीक कल्याण व उल्हासनगरच्या हद्दीवर वालधुनी नदीवर हा पूल आहे. येथील जुना पूल अरुंद आणि धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. केवळ नवीन पुलावरून वाहतूक होत असल्याने त्यावर वाहतुकीचा ताण पडत येत आहे. त्यामुळे या पुलावरील काँक्रिट उखडले गेले आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.

कल्याण-बदलापूर रस्त्याने पुढे कर्जत, पुणे, मुरबाडकडे जाता येते. त्यामुळे तेथे जाणारी वाहने याच पुलावरून जातात. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे वाहतुकीचा ताण कल्याणवर आला आहे. त्यात पत्रीपूल बंद केला असून, तो पाडला जाणार आहे. वालधुनी पुलावरूनही अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. त्याचा फटका उल्हासनगरच्या हद्दीत पाहायला मिळतो.सध्या सुरू असलेल्या पुलाची अवस्था बिकट असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पुलाचे बांधकाम २००४ मध्ये झाले आहे. जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद आहे. मात्र, तो सुरू असल्यापासूनच नवीन पुलावर वाहने उभी केली जातात.सा.बां. विभागाकडून पुलाच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्षच्जुना पूल सुरू असल्यापासूनच नव्या पुलावर अवजड ट्रक आणि खाजगी बस उभ्या करून ठेवल्या जातात, याकडे आरटीओ कार्यालय व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उल्हासनगर शाखेच्या अखत्यारित येतो. या खात्याकडून पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक व वाहनचालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा