शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:24 IST

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे.

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. मात्र अंबरनाथमध्ये ज्या चौकात खड्डे होते त्याच चौकात बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाचाच खड्डयामुळे जीव गेला. वाहतूक पोलिसाचा खड्ड्यामुळे जीव गेल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.ज्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते त्या रस्त्यावर आता सातत्याने दुरुस्तीची कामे सुरु आहे. मात्र असे असले तरी खड्डयामुळे होणारा त्रास मात्र अजूनही कायम आहे. तर ज्या खड्डयामुळे पोलिसाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयाचा आधार हरपला आहे. वाहतूक पोलीस म्हणून काम करणारे संजीव पाटील हे डीएमसी चौकातून जात असताना रस्त्यावरील खड्डयामुळे त्यांच्या गाडीचा तोल गेला. खड्डयामुळे ते आपल्या दुचाकीसह खाली पडले. याचवेळी मागून येणाºया ट्रकने त्यांना चिरडले. वाहतूक नियंत्रित करत असतांनाच त्यांना अपघाताचा सामना करावा लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या चौकात अपघात झाला त्याच चौकात अनेक ठिकाणी रस्ता खड्डयात गेला आहे. पेव्हर ब्लॉकही निघाल्याने त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि मोबाइलच्या वाहिन्या टाकण्यासाठी पेव्हरब्लॉक काढण्यात आले होते. मात्र या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणि पेव्हरब्लॉक यांच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्डयामुळे एखाद्याचा जीव जाणार अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र या खड्डयाचा सर्वात मोठा फटका हा याच चौकात पोलिसांनाच बसला आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयात तोल गेल्याने पाटील यांना मागून येणाºया ट्रकने उडविले. हा सर्व प्रकार भर चौकात इतर वाहतूक पोलिसांच्या समोरच घडला. पाटील यांचा मृत्यू हा अपघाती असला तरी या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएच जबाबदार असल्याची ओरड झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरु करण्यासाठी मार्च महिन्यातच आदेश दिलेले असतांनाही त्याचे काम ठेकेदाराने वेळेत सुरु केले नाही. ठेकेदार आणि एमएमआरडीएचे अधिकारी सातत्याने या कामासाठी विलंब करत राहिले. आधी आचारसंहिता, नंतर वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यावर पावसाळा सुरु झाल्याने पावसात वाहतूक विभागाने रस्ते खोदण्यास हरकत घेतली. या सर्व कारणांमुळे ठेकेदारालाही या ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे काम करता आलेले नाही. काम करणे शक्य नसतांना किमान खड्डे भरण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र ते खड्डेही भरण्यात आलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएकडे बोट दाखवत आहे तर एमएमआरडीए सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी ठरवत आहेत. सरकारी अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा फटका एका वाहतूक पोलीस कर्मचाºयाला सहन करावा लागला. आज एका कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. सरकारी स्तरावर त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस मदत हाती आलेली नाही. मदत कितीही आली तरी आपल्या घरचा आधार पुन्हा येणार नाही याची जाणीव पाटील कुटुंबीयांना झाली आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत मदतीसाठी प्रस्तावही गेला आहे. आज ना उद्या मदत मिळेल देखील, मात्र कुटुंबातील आपला हक्काचा माणूस नसेल याचे शल्य कायम राहणार आहे.