शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:24 IST

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे.

खराब रस्ते आणि खड्डयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. मात्र अंबरनाथमध्ये ज्या चौकात खड्डे होते त्याच चौकात बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाचाच खड्डयामुळे जीव गेला. वाहतूक पोलिसाचा खड्ड्यामुळे जीव गेल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.ज्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते त्या रस्त्यावर आता सातत्याने दुरुस्तीची कामे सुरु आहे. मात्र असे असले तरी खड्डयामुळे होणारा त्रास मात्र अजूनही कायम आहे. तर ज्या खड्डयामुळे पोलिसाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयाचा आधार हरपला आहे. वाहतूक पोलीस म्हणून काम करणारे संजीव पाटील हे डीएमसी चौकातून जात असताना रस्त्यावरील खड्डयामुळे त्यांच्या गाडीचा तोल गेला. खड्डयामुळे ते आपल्या दुचाकीसह खाली पडले. याचवेळी मागून येणाºया ट्रकने त्यांना चिरडले. वाहतूक नियंत्रित करत असतांनाच त्यांना अपघाताचा सामना करावा लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या चौकात अपघात झाला त्याच चौकात अनेक ठिकाणी रस्ता खड्डयात गेला आहे. पेव्हर ब्लॉकही निघाल्याने त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि मोबाइलच्या वाहिन्या टाकण्यासाठी पेव्हरब्लॉक काढण्यात आले होते. मात्र या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणि पेव्हरब्लॉक यांच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्डयामुळे एखाद्याचा जीव जाणार अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र या खड्डयाचा सर्वात मोठा फटका हा याच चौकात पोलिसांनाच बसला आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयात तोल गेल्याने पाटील यांना मागून येणाºया ट्रकने उडविले. हा सर्व प्रकार भर चौकात इतर वाहतूक पोलिसांच्या समोरच घडला. पाटील यांचा मृत्यू हा अपघाती असला तरी या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएच जबाबदार असल्याची ओरड झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरु करण्यासाठी मार्च महिन्यातच आदेश दिलेले असतांनाही त्याचे काम ठेकेदाराने वेळेत सुरु केले नाही. ठेकेदार आणि एमएमआरडीएचे अधिकारी सातत्याने या कामासाठी विलंब करत राहिले. आधी आचारसंहिता, नंतर वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यावर पावसाळा सुरु झाल्याने पावसात वाहतूक विभागाने रस्ते खोदण्यास हरकत घेतली. या सर्व कारणांमुळे ठेकेदारालाही या ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे काम करता आलेले नाही. काम करणे शक्य नसतांना किमान खड्डे भरण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र ते खड्डेही भरण्यात आलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएकडे बोट दाखवत आहे तर एमएमआरडीए सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी ठरवत आहेत. सरकारी अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा फटका एका वाहतूक पोलीस कर्मचाºयाला सहन करावा लागला. आज एका कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. सरकारी स्तरावर त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस मदत हाती आलेली नाही. मदत कितीही आली तरी आपल्या घरचा आधार पुन्हा येणार नाही याची जाणीव पाटील कुटुंबीयांना झाली आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत मदतीसाठी प्रस्तावही गेला आहे. आज ना उद्या मदत मिळेल देखील, मात्र कुटुंबातील आपला हक्काचा माणूस नसेल याचे शल्य कायम राहणार आहे.