शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

भावलीच्या पाण्यासाठी शहापूरकरांना प्रतीक्षा

By admin | Updated: April 1, 2017 05:50 IST

ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी

ठाणे : ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी जलाशये व धरणे आहेत. मात्र, या तालुक्याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मंत्रालयात बैठकीत घेतल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. मात्र, भावली पाणीयोजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असली तरी तो दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहापुरातील ९७ गावे व २५९ पाड्यांना पाण्यासाठी अजून दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.पाणी आरक्षित समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. यामुळे या समितीच्या बैठकीत शहापूरच्या पाणीटंचाईवर चर्चा करून भीमनवार यांनी भावली धरणाद्वारे या टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे पटवून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईला आता कायमचा पूर्णविराम मिळणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात भावली-दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण आहे. या धरणाची सुमारे दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाडे सुमारे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर आहेत. यामुळे भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणीपुरवठा करता येणार आहे. यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा भीमनवार यांचा दावा आहे. या आरक्षित पाण्यातून माणशी ७० लीटर दरडोई प्रत्येक दिवशी पाणी पुरवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही योजना देखभाल व दुरु स्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासींना कमी दरात पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)