शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

भावलीच्या पाण्यासाठी शहापूरकरांना प्रतीक्षा

By admin | Updated: April 1, 2017 05:50 IST

ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी

ठाणे : ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी जलाशये व धरणे आहेत. मात्र, या तालुक्याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मंत्रालयात बैठकीत घेतल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. मात्र, भावली पाणीयोजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असली तरी तो दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहापुरातील ९७ गावे व २५९ पाड्यांना पाण्यासाठी अजून दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.पाणी आरक्षित समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. यामुळे या समितीच्या बैठकीत शहापूरच्या पाणीटंचाईवर चर्चा करून भीमनवार यांनी भावली धरणाद्वारे या टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे पटवून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईला आता कायमचा पूर्णविराम मिळणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात भावली-दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण आहे. या धरणाची सुमारे दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाडे सुमारे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर आहेत. यामुळे भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणीपुरवठा करता येणार आहे. यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा भीमनवार यांचा दावा आहे. या आरक्षित पाण्यातून माणशी ७० लीटर दरडोई प्रत्येक दिवशी पाणी पुरवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही योजना देखभाल व दुरु स्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासींना कमी दरात पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)