शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाडा, डहाणूत करप्याचे थैमान; पावसाने मारली प्रदीर्घ दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:45 IST

भाताची रोपे पडली पिवळी, वरुणराजा बरसण्याची गरज

वाडा : यावर्षी पाऊस उत्तम पडल्याने भातशेती जोमात बहरली होती. भाताचे उत्पादन देखील विक्र मी होईल या आशेवर शेतकरी होता. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तिच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.भाताचे कोठार म्हणून संबोधिले जात असलेल्या वाडा येथील कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. १७६ गावे व दोनशेहून अधिक पाड्यातील १८००० प्रक्षेत्रामध्ये या भाताची लागवड केली जाते. येथील जिनी वाडा कॉलम, सुरती, ४ गुजरात, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसूरी, आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतले जाते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिकरणामुळे येथील मजूर पुण्यात वरती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे.भातशेतीत एकरी येणारा खर्च व त्यातून मिळालेले उत्पन्न यांची गोळाबेरीज केली असता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शेती तोट्यात चालली आहे. तरीही पारंपरिक व्यवसाय असल्याने शेती ओस ठेवली तर लोक हसतात म्हणून शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेती करावी लागते. यावर्षी पिके बाहेर पडण्याची वेळ आली तरी पाऊस पडत नसल्याने भात पिकावर करपाची लागण झाल्याने पिके पूर्ण वाया वाया जातील अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुरता कोंडीत सापडला आहे. तरी कृषी विभाग मात्र झोपी गेलेला आहे. भात शेतीची पाहणी करायला त्यांना वेळ नसल्याने पिके पूर्ण हातातून जातात की काय अशी भीती शेतकºयाला वाटू लागले आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात....!मोखाडा : गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने भात पीक संकटात आले आहे जमिनीला तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली असून पाण्याअभावी शेतातील कवळी रोपटी सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी ‘बगळया’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने अनेक विघ्नांवर मात करून हातातोंडाशी आणलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न येऊन ठाकला आहे.तालुक्यात २५९ गावपाडे असून नागली, भात, वरई, खुरासनी, कुळीद, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात परंतु यामधील ‘भात’ हे पीक प्रामुख्याने घेतले जात असून २ हजार ३७ हेक्टरात भात पीक घेतले जाते. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे १०० टक्के भाताची रोवणी करण्यात आली. परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आली आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अनेक शेतात आता भेगा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दहा दिवसांत पाऊस आला नाही तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.तसेच भेगांचा परिणाम पिकांवर होवू नये यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते विशेष म्हणजे गतवर्षी पावसाने ताण दिल्याने आॅगस्टच्या महिन्यात ही रोवणी करण्यात आली व ही पिके चांगली पिकावीत यासाठी शेवटापर्यत पावसाची आवश्यकता असतांना पावसाअभावी भात पीक पिवळसर पडत आहे. काही भागात वाढत्या तापमानामुळे पीके सुकू लागली आहे. तसेच मागील ढगाळ वातावरणाचा परिणाम कीडींचा प्रादुर्भाव वाढविण्यात झाला आहे. काही भागात ‘खोड किडा’ व बगळयाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाने आणखी ताण दिल्यास कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.करपा रोगामुळे व पाण्याअभावी उत्पादनावर परिणामडहाणू/बोर्डी : आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस अक्षरश: गायब झाल्याने पाण्याअभावी नापिकीचा सामना करावा लागेल असे सध्याचे चित्र आहे. गतवर्षी खोडकीडा तर आता करपा रोगाची लागण आणि उंदरांनी उच्छाद मांडल्याने पिक धोक्यात आले आहे. तालुक्यात भात हे प्रमुख पीक १५ हजार हेक्टरात घेण्यात येते. जमीन व पाण्यानुसार २५४५ हेक्टरात हळवे, ९९०६ हे पिक घेतले जाते.निमगरवे आणि २५४० या गरव्या भाताचीही लागवड केली जाते. यंदा सरासरी 95 टक्के भात लावणी झाली आहे. येथील सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून यावर्षी आतापर्यंत १८०० मिमी पाऊस झाला आहे. तर गतवर्षी २ हजार मिमीचा टप्पा पावसाने ओलांडला होता. यावेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील काही दिवस पाऊस न झाल्याने खाचरातील पाणी सुकले असून पिकं पिवळी पडली. हा एकप्रकारचा रोग असल्याचे म्हणणे आहे.मागील वर्षी परतीच्या पावसाने आणि खोडकिड्याने बळीराजाला नुकसानीचा सामना करायला लावला होता. शिवाय मागील वर्षी भात पीक विमा योजनेचे पैसे भरले होते, मात्र नुकसान होऊनही आजतागायत त्याची भरपाई निम्यापेक्षा अधिक शेतकºयांना मिळलेली नाही. दरम्यान ग्रामपंचायतीअंतर्गत असलेले कोंडवाडे हद्दपार झाल्याने मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. सर्व समस्यांचा सामना करून जे पीक शेतात उभे राहील ते गुरांमुळे हाती लागणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी