शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालचा सायकलपटू करतोय भारतयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ...

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता वाहतूक नियमांविषयी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून आलेला सायकलिस्ट हा २०० हून अधिक दिवस भारत भ्रमण करीत आहे. सायकलिंग केल्याने माणूस फिट राहतो तसेच, प्रदूषण तर टाळता येते आणि वाहतूककोंडीही टाळता येते, असा संदेश तो भारतभ्रमणादरम्यान नागरिकांना देत आहे. मधाई पाल असे या तरुणाचे नाव आहे.

दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढत आहे. सरकार त्यांच्या परीने जागृती करण्याचा प्रयत्न करीत असली तरी नागरिक म्हणून आपलेदेखील वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. स्व सुरक्षा बरोबर इतरांचाही जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असा संदेश देण्यासाठी पाल हा १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथील आपल्या घरातून भारतभ्रमणसाठी निघाला आहे. पश्चिम बंगालहून सुरुवात करून ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, केल्यानंतर पाल हा तरुण दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पोहचला. शुक्रवारी ठाण्यात आल्यावर अनेक ठाणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. सागर साळवी या तरुणाने नौपाडा येथे पाल दिसल्यावर त्याला थांबविले. त्याचा पुढचा प्रवास गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर तसेच भारतातील सर्व राज्य पूर्ण करून पुन्हा तो त्याच्या राज्यात जाणार आहे. सायकलपुढे तिरंगा तर मागे समान घेऊन तो सायकल चालवतो. सकाळी ६ ते सायंकाळी ६ यादरम्यान तो सायकल चालवितो.

--------------------

- सध्या वाहतूककोंडी आणि त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढत आहे. त्यामुळे सायकल चालवून आपण या दोन्ही समस्या सोडवू शकतो असे पाल याने सांगितले.

- तरुण पिढी व्यायामासाठी जिमला जाते. तसेच, थोड्या थोड्या अंतरावर गाडीचा वापर करतात. परंतु, सायकल चालविण्याची त्यांनी सवय करावी याने फिटदेखील ते राहतील आणि इंधन बचत होईल, असेही पाल म्हणाला.

......

* सायकल चालवित असताना या यात्रेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. पण या अडचणींवर मात करून फक्त स्वतःच्या सायकलिंगवर लक्ष्य केंद्रित करून भारत भ्रमण करीत आहे.

- मधाई पाल

-------------