शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

प. बंगालचा सायकलपटू करतोय भारतयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ...

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता वाहतूक नियमांविषयी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून आलेला सायकलिस्ट हा २०० हून अधिक दिवस भारत भ्रमण करीत आहे. सायकलिंग केल्याने माणूस फिट राहतो तसेच, प्रदूषण तर टाळता येते आणि वाहतूककोंडीही टाळता येते, असा संदेश तो भारतभ्रमणादरम्यान नागरिकांना देत आहे. मधाई पाल असे या तरुणाचे नाव आहे.

दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढत आहे. सरकार त्यांच्या परीने जागृती करण्याचा प्रयत्न करीत असली तरी नागरिक म्हणून आपलेदेखील वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. स्व सुरक्षा बरोबर इतरांचाही जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असा संदेश देण्यासाठी पाल हा १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथील आपल्या घरातून भारतभ्रमणसाठी निघाला आहे. पश्चिम बंगालहून सुरुवात करून ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, केल्यानंतर पाल हा तरुण दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पोहचला. शुक्रवारी ठाण्यात आल्यावर अनेक ठाणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. सागर साळवी या तरुणाने नौपाडा येथे पाल दिसल्यावर त्याला थांबविले. त्याचा पुढचा प्रवास गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर तसेच भारतातील सर्व राज्य पूर्ण करून पुन्हा तो त्याच्या राज्यात जाणार आहे. सायकलपुढे तिरंगा तर मागे समान घेऊन तो सायकल चालवतो. सकाळी ६ ते सायंकाळी ६ यादरम्यान तो सायकल चालवितो.

--------------------

- सध्या वाहतूककोंडी आणि त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढत आहे. त्यामुळे सायकल चालवून आपण या दोन्ही समस्या सोडवू शकतो असे पाल याने सांगितले.

- तरुण पिढी व्यायामासाठी जिमला जाते. तसेच, थोड्या थोड्या अंतरावर गाडीचा वापर करतात. परंतु, सायकल चालविण्याची त्यांनी सवय करावी याने फिटदेखील ते राहतील आणि इंधन बचत होईल, असेही पाल म्हणाला.

......

* सायकल चालवित असताना या यात्रेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. पण या अडचणींवर मात करून फक्त स्वतःच्या सायकलिंगवर लक्ष्य केंद्रित करून भारत भ्रमण करीत आहे.

- मधाई पाल

-------------