शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प. बंगालचा सायकलपटू करतोय भारतयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ...

२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता वाहतूक नियमांविषयी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून आलेला सायकलिस्ट हा २०० हून अधिक दिवस भारत भ्रमण करीत आहे. सायकलिंग केल्याने माणूस फिट राहतो तसेच, प्रदूषण तर टाळता येते आणि वाहतूककोंडीही टाळता येते, असा संदेश तो भारतभ्रमणादरम्यान नागरिकांना देत आहे. मधाई पाल असे या तरुणाचे नाव आहे.

दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढत आहे. सरकार त्यांच्या परीने जागृती करण्याचा प्रयत्न करीत असली तरी नागरिक म्हणून आपलेदेखील वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. स्व सुरक्षा बरोबर इतरांचाही जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असा संदेश देण्यासाठी पाल हा १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथील आपल्या घरातून भारतभ्रमणसाठी निघाला आहे. पश्चिम बंगालहून सुरुवात करून ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, केल्यानंतर पाल हा तरुण दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पोहचला. शुक्रवारी ठाण्यात आल्यावर अनेक ठाणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. सागर साळवी या तरुणाने नौपाडा येथे पाल दिसल्यावर त्याला थांबविले. त्याचा पुढचा प्रवास गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर तसेच भारतातील सर्व राज्य पूर्ण करून पुन्हा तो त्याच्या राज्यात जाणार आहे. सायकलपुढे तिरंगा तर मागे समान घेऊन तो सायकल चालवतो. सकाळी ६ ते सायंकाळी ६ यादरम्यान तो सायकल चालवितो.

--------------------

- सध्या वाहतूककोंडी आणि त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढत आहे. त्यामुळे सायकल चालवून आपण या दोन्ही समस्या सोडवू शकतो असे पाल याने सांगितले.

- तरुण पिढी व्यायामासाठी जिमला जाते. तसेच, थोड्या थोड्या अंतरावर गाडीचा वापर करतात. परंतु, सायकल चालविण्याची त्यांनी सवय करावी याने फिटदेखील ते राहतील आणि इंधन बचत होईल, असेही पाल म्हणाला.

......

* सायकल चालवित असताना या यात्रेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. पण या अडचणींवर मात करून फक्त स्वतःच्या सायकलिंगवर लक्ष्य केंद्रित करून भारत भ्रमण करीत आहे.

- मधाई पाल

-------------