शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मतदानकेंद्रांवर स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांना पाठवण्याची सक्ती, शाळांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 05:05 IST

पालकांचा नकार : निवडणूक अधिकाऱ्यांचे शाळांना आदेश

जान्हवी मोर्ये डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवर दोन शालेय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवावेत, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवलीतील शाळांना दिले आहेत. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शाळांची अडचण होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपले जाते. त्यापाठोपाठ आता विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून घेतले जाणार असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या या अजब प्रकाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याण पश्चिमेत ७०, तर पूर्वेत ७० अशा १४० शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणारे १४ ते १७ वयोगटांतील दोन विद्यार्थी मतदानकेंद्रांवर स्वयंसेवक म्हणून पाठवावेत, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना एका बैठकीत दिली आहे. निवडणूक प्रक्रिया काय आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा यामागील उद्देश आहे. तसेच मतदानासाठी येणारे अपंग, वृद्ध मतदार यांच्या मदतीसाठीही हे स्वयंसेवक काम करणार आहेत.

निवडणूक अधिकाºयांनी शाळांना पाठवलेल्या पत्रात दोन स्वयंसेवकांचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात मुख्याध्यापकांच्या बैठकीत प्रत्येक शाळेने चार स्वयंसेवक विद्यार्थी पाठवावेत. तसेच विद्यार्थी पाठवणे सक्तीचे आहे, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, पत्र आणि तोंडी आदेश यात तफावत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनामध्ये याविषयी संभ्रमावस्था आहे.अधिकाºयांनी बैठकीत विद्यार्थ्यांना मानधन दिले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश कुठेही दाखवलेला नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मतदानकेंद्रावर स्वयंसेवक म्हणून नेमा अथवा त्यांची मदत घ्या, असा आदेश निवडणूक आयोगाकडून काढला गेला आहे का, याची विचारणाही शाळांनी अधिकाºयांकडे केली. त्यावर अधिकाºयांकडे निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत नव्हती. त्यामुळे त्यांना ती देता आली नाही.पालकांची इच्छा नसल्यास विद्यार्थ्यांनी येऊ नयेनिवडणूक क्षेत्रीय अधिकारी दिलीप शिंदे यांच्या स्वाक्षरीने शाळांना पत्र दिले गेले आहे. त्यामुळे याबाबत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, पालकांचा विरोध असेल तर त्या पाल्यांनी आले नाही तर चालेल. हा जबरदस्तीचा मामला नाही. स्वयंसेवकाचे काम करणाºया विद्यार्थ्याला मानधन दिले जाईल, असे तहसीलदारांनी मुख्याध्यापकांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती नाही. 

टॅग्स :ElectionनिवडणूकStudentविद्यार्थी