शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मतदारांनाच विकासापेक्षा जातीय समीकरणांत रस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:15 IST

पांडुरंग कुंभार भिवंडी लोकसभा निवडणुकीत यंदा आजी-माजी खासदारांत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. वास्तविक विकासाच्या मुद्द्यावर राजकारण अपेक्षित होते. मात्र, ...

पांडुरंग कुंभारभिवंडी लोकसभा निवडणुकीत यंदा आजी-माजी खासदारांत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. वास्तविक विकासाच्या मुद्द्यावर राजकारण अपेक्षित होते. मात्र, येथे हा मुद्दा बाजूला सरून जातीय समीकरणे, राजकीय पक्षांचे बलस्थान आणि नाराज मतदार या तीन विषयांवर मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदान दीड टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे कपील पाटील व काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात दिसली. २०१४च्या तुलनेत या निवडणुकीत दोन लाख मतदार वाढल्याने मतदानही दीड टक्क्यांनी वाढले. या निवडणुकीत १८ लाख ८९ हजार ७८८ मतदारांपैकी १० लाख ०२हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी ५३.०७ इतकी होती. मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु गेल्या निवडणुकीत मोदी लाटेने कपील पाटील निवडून आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करता शहापूर, मुरबाड व भिवंडी ग्रामीणचे मतदान वाढले आहे. तर एकट्या मुरबाडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ हजारांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत कपील पाटील यांना कल्याण पश्चिम व मुरबाड येथून सर्वाधिक मते मिळाली होती.

भिवंडीत मतदान फारसे वाढलेले दिसून येत नाही. येथे २०१४ च्या निवडणुकीत ५१.५८ टक्के मतदान झाले होते. तर यंदा १८ लाख ८९ हजार ७८८ मतदारांपैकी १० लाख २हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान ५३.०७ टक्के इतके झाले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत दीड टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या वर्षी ५१.५८ टक्के मतदान झाले होते.

मतदानाची टक्केवारी दीड टक्क््यांनी वाढलेली असली तरी एकूण मतदारसंख्या १ लाख २७ हजार ८४४ इतकी मोठी आहे. त्यामुळे ही मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील त्यांना विजयोत्सव साजरा करता येईल, हे गृहीत आहे. ग्रामीण भागातील आगरी, कुणबी समाजाने नेमका कोणाला कौल दिला आहे, त्याबद्दल सध्या दोन्ही उमेदवार आणि पक्षांतर्फे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतून मतदान वाढले, तर ते भाजपच्या पारंपरिक मतदारांचे असेल आणि त्याचा भाजपला फायदा होईल, असा दावा केला जातो आहे. मात्र, ते भाजपविरोधातील नकारात्मक मतदान असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे सारी भिस्त भिवंडी ग्रामीणच्या मतदारांवरच आहे.

कल्याण व मुरबाड येथे हक्काची मते असल्याने आम्ही येथे आघाडी घेणार आहोत. तर भिवंडी ग्रामीणमध्ये देखील आाम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. या निवडणुकीत किमान दीड लाखाच्या मताधिक्यांनी आम्ही निवडून येणार आहोत, याचा आम्हाला विश्वास आहे. - कपील पाटील, भाजप उमेदवार

भिवंडीसह इतर ठिकाणी आम्हाला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. कल्याण पश्चिम व बदलापूर येथे कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याची भर शहापूर, मुरबाड व मुरबाड ग्रामीणमधून भरून निघेल. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला जिंकून येण्याची खात्री आहे.- सुरेश टावरे, काँग्रेस उमेदवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandi-pcभिवंडी