शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विधिमंडळात उठविणार आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:28 IST

केडीएमसी हद्दीत १९८७ ते २००७ दरम्यान झालेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी अग्यार समितीने तत्कालीन आयुक्त, जिल्हाधिकारी, वनअधिकारी, प्रभाग अधिकारी, वास्तूविशारद आणि बिल्डरांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात कारवाईची शिफारस केली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीत १९८७ ते २००७ दरम्यान झालेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी अग्यार समितीने तत्कालीन आयुक्त, जिल्हाधिकारी, वनअधिकारी, प्रभाग अधिकारी, वास्तूविशारद आणि बिल्डरांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात कारवाईची शिफारस केली आहे. या शिफारशींच्या अंमलबजावणी करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अग्यार समितीचे भय महापालिका अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच घेताना अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना झालेली अटक, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. बेकायदा बांधकामे ही येथील अधिकाºयांसाठी भ्रष्टाचारीची कुरणे आहे. भ्रष्ट अधिकाºयांना जरब बसावी, यासाठी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या करता सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे पवार यांनी सांगितले.महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले की, अग्यार समितीने संबंधितांच्या विरोधात कारवाईची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. हा अहवाल न्यायालयात सादर झालेला आहे. न्यायालय या विषयी काय निर्णय देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. समितीने अभ्यासाअंती अहवाल सादर केला. तो बाहेर येण्यास बराच कालावधी लागला. मात्र, दरम्यानच्या काळात बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई न करणाºया प्रभाग अधिकाºयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, असा आदेश सरकारने काढला. त्याची अंमलबजावणी झालेलीच नाही. सरकार केवळ जीआर काढते, कायदे करते. मात्र, त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे हे सरकार केवळ बोलघेवडे आहे. अंमलबजावणी होणार नसेल तर कायदे करून उपयोग काय. त्यामुळे जबाबदार असलेल्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांबाबत अग्यार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी. भाजपा सरकार स्वत: पारदर्शक असल्याचे सांगते. जबाबदार असलेल्यांवर सरकारने कारवाई न केल्यास त्यांच्याकडून त्यांची पाठराखण झाल्यासारखे होईल. मात्र, अहवालात त्यांना काहीच दिसले नाही, तर ते अधिकच पारदर्शक असल्याचे उघड होईल, अशी खोचक टीका मंदार हळबे यांनी केली आहे.