शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधिमंडळात उठविणार आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:28 IST

केडीएमसी हद्दीत १९८७ ते २००७ दरम्यान झालेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी अग्यार समितीने तत्कालीन आयुक्त, जिल्हाधिकारी, वनअधिकारी, प्रभाग अधिकारी, वास्तूविशारद आणि बिल्डरांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात कारवाईची शिफारस केली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीत १९८७ ते २००७ दरम्यान झालेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी अग्यार समितीने तत्कालीन आयुक्त, जिल्हाधिकारी, वनअधिकारी, प्रभाग अधिकारी, वास्तूविशारद आणि बिल्डरांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात कारवाईची शिफारस केली आहे. या शिफारशींच्या अंमलबजावणी करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अग्यार समितीचे भय महापालिका अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. बेकायदा बांधकामप्रकरणी आठ लाख रुपयांची लाच घेताना अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना झालेली अटक, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. बेकायदा बांधकामे ही येथील अधिकाºयांसाठी भ्रष्टाचारीची कुरणे आहे. भ्रष्ट अधिकाºयांना जरब बसावी, यासाठी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या करता सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे पवार यांनी सांगितले.महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले की, अग्यार समितीने संबंधितांच्या विरोधात कारवाईची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. हा अहवाल न्यायालयात सादर झालेला आहे. न्यायालय या विषयी काय निर्णय देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. समितीने अभ्यासाअंती अहवाल सादर केला. तो बाहेर येण्यास बराच कालावधी लागला. मात्र, दरम्यानच्या काळात बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई न करणाºया प्रभाग अधिकाºयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, असा आदेश सरकारने काढला. त्याची अंमलबजावणी झालेलीच नाही. सरकार केवळ जीआर काढते, कायदे करते. मात्र, त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे हे सरकार केवळ बोलघेवडे आहे. अंमलबजावणी होणार नसेल तर कायदे करून उपयोग काय. त्यामुळे जबाबदार असलेल्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांबाबत अग्यार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी. भाजपा सरकार स्वत: पारदर्शक असल्याचे सांगते. जबाबदार असलेल्यांवर सरकारने कारवाई न केल्यास त्यांच्याकडून त्यांची पाठराखण झाल्यासारखे होईल. मात्र, अहवालात त्यांना काहीच दिसले नाही, तर ते अधिकच पारदर्शक असल्याचे उघड होईल, अशी खोचक टीका मंदार हळबे यांनी केली आहे.