शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

व्हायरल ‘ताप’ ठरतोय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : बदलत्या हवामानामुळे कल्याण-डोंबिवली शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे सावट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : बदलत्या हवामानामुळे कल्याण-डोंबिवली शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे सावट कायम असताना व्हायरल ताप डोकेदुखी ठरत असून जून, जुलैचा आढावा घेता, ४१ दिवसांत चार हजार ५०४ रुग्ण आढळून आले आहेत. व्हायरल ताप वाढला असताना, तिघांना डेंग्यूची आणि सातजणांना मलेरियाची लागण झाली आहे.

जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, लेप्टो स्पायरोसिस, स्वाईन फ्लू, चिकुनगुन्या आदी आजारांची लागण होत असल्याचे मनपा हद्दीतील दाटवस्त्यांसह अन्य ठिकाणच्या लोकवस्तीत दिसून येते. यंदाही पावसाळ्यातील या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, व्हायरल ताप, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, अतिसार, हगवण (डायरिया), कावीळ, टायफॉइडचे रुग्ण आढळले आहेत.

जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस पडला; मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यापासून ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जूनमध्ये व्हायरल तापाचे तीन हजार ६७२ रुग्ण, तर ११ जुलैपर्यंत ८३२ रुग्ण आढळले आहेत. एकत्रित आढावा घेता, ४१ दिवसांत चार हजार ५०४ व्हायरल तापाचे रुग्ण आढळले आहेत, तर, गॅस्ट्रोचे ७, अतिसारचे २७, हगवण १३, कावीळ २२, टायफॉईडचे १४, डेंग्यू ३, मलेरियाचे सात रुग्ण आढळले आहेत. तापाबरोबरच सर्दी-खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात व्हायरल तापाचे रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

------------------------

‘ताप अंगावर काढू नका’

बदलत्या हवामानात तापाचे, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्या तापाचे रुग्ण वाढले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे अंगावर ताप काढू नका. या साथरोगाच्या वातावरणात जर ताप, सर्दी, खोकला असला तरी कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. कोरोना नसल्याचे निदान झाल्यास त्याप्रमाणे पुढील उपचार घेऊ शकतात.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग प्रतिबंधक विभाग अधिकारी, केडीएमसी

-----------------------------------

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के

सध्या दररोज ७२ ते ११० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के इतके असून, मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. दररोज साडेतीन ते चार हजार कोरोना चाचण्या होत आहेत. ३२ केंद्रांवर कोरोना चाचणी सुरू असून, सध्या मनपाचे डोंबिवलीतील हभप कै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, जिमखाना आणि कल्याणमधील आर्ट गॅलरी ही तीनच कोरोना उपचार केंद्र सुरू आहेत, अशी माहिती डॉ. पानपाटील यांनी दिली.

------------------------