शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने

By सुरेश लोखंडे | Updated: February 29, 2024 14:20 IST

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे.

ठाणे :  मुस्लिम पर्सनल लाॅ अर्थात शरीयत कायद्यानुसार होणारे निकाह रद्दबातल करून ते विशेष मॅरेज एक्टमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जात आहे. त्याची सुरूवात आसाममधून करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने करून या विवाह कायद्यातून मुस्लिम महिलांना वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आतापर्यंत देशभर शरियत कायद्यानुसार मुस्लीम धर्मियांचे विवाह अर्थात निकाह पार पाडले जात होते. विवाह न टिकल्यास घटस्फोटही तलाक पद्धतीने केले जात होते. हे तलाक करताना समाजातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत तलाक झालेल्या महिलेला मेहेर म्हणजेच नुकसानभरपाई देण्यात येते. त्यातून त्या महिलेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. मात्र, विशेष विवाह कायद्यातून मुस्लीम महिलांवरील अन्याय वाढणार असल्याचा आरोप करीत  पठाण यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली.या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितले की,

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बालविवाहाची मर्यादा या देशात आतापर्यंत तीनवेळा वाढविण्यात आली आहे, बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे असताना विशेष विवाह कायदा राबवून शरीयतवर गदा आणण्याची गरजच काय? या नवीन कायद्याने मुस्लीम महिलांना मिळणारा मेहर तर बंद होणारच आहे. शिवाय निकाह करणारे काझीदेखील बेरोजगार होणार आहेत. या कायद्यातील पळवाटा शोधून मुस्लीम महिलांचे आर्थिक शोषण होणार असल्याने विशेष विवाह कायद्यातून मुस्लीमांना वगळावे; अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यां महिलांनी केला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम