शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

विशेष विवाह कायद्यातून मुस्लिमांना वगळ्यासाठी ठाण्यात महिलांची जोरदार निदर्शने

By सुरेश लोखंडे | Updated: February 29, 2024 14:20 IST

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे.

ठाणे :  मुस्लिम पर्सनल लाॅ अर्थात शरीयत कायद्यानुसार होणारे निकाह रद्दबातल करून ते विशेष मॅरेज एक्टमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जात आहे. त्याची सुरूवात आसाममधून करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने करून या विवाह कायद्यातून मुस्लिम महिलांना वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आतापर्यंत देशभर शरियत कायद्यानुसार मुस्लीम धर्मियांचे विवाह अर्थात निकाह पार पाडले जात होते. विवाह न टिकल्यास घटस्फोटही तलाक पद्धतीने केले जात होते. हे तलाक करताना समाजातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत तलाक झालेल्या महिलेला मेहेर म्हणजेच नुकसानभरपाई देण्यात येते. त्यातून त्या महिलेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. मात्र, विशेष विवाह कायद्यातून मुस्लीम महिलांवरील अन्याय वाढणार असल्याचा आरोप करीत  पठाण यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली.या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितले की,

मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बालविवाहाची मर्यादा या देशात आतापर्यंत तीनवेळा वाढविण्यात आली आहे, बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे असताना विशेष विवाह कायदा राबवून शरीयतवर गदा आणण्याची गरजच काय? या नवीन कायद्याने मुस्लीम महिलांना मिळणारा मेहर तर बंद होणारच आहे. शिवाय निकाह करणारे काझीदेखील बेरोजगार होणार आहेत. या कायद्यातील पळवाटा शोधून मुस्लीम महिलांचे आर्थिक शोषण होणार असल्याने विशेष विवाह कायद्यातून मुस्लीमांना वगळावे; अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यां महिलांनी केला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम