शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीणमध्ये २३ दिवसांमध्ये ११०३ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:04 IST

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून २७ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एक हजार १०३ वाहने जप्त केली आहेत.

ठळक मुद्दे४८ लाख २३ हजारांचा दंड वसूल १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील अनेक भागांमध्ये कडक कारवाई केली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एक हजार १०३ वाहने जप्त केली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाख २३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून २७ ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त, नाका तपासणी आणि ग्रामीण भागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत गस्तही वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड आणि मीरा रोड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे या भागात नाके तपासणी मोठया प्रमाणावर केली जात आहे. २२ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान या सर्वच भागांमधून विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक विभाग तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. याच कारवाईमध्ये एक हजार ४३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून ४६ लाख पाच हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, विनाकारण रस्त्यावर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाºया ७२ आरोपींविरुद्ध १३ एप्रिल रोजी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची ६० वाहने एकाच दिवसात पोलिसांनी जप्त केली आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त विनाकारण फिरणा-या ५७५ वाहन चालकांवरही १३ एप्रिल रोजी मोटार वाहन कायद्याखाली कारवाई झाली. त्यांच्याकडूनही एकाच दिवसामध्ये दोन लाख १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. संचारबंदीचे पालन करावे. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत एक लाख १०३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून सुमारे ४८ लाखांचा दंड वसूल केला. शिवाय, अनेकांवर संचारबंदीच्या उल्लंघनाची कारवाई केली आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसArrestअटक