शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीणमध्ये २३ दिवसांमध्ये ११०३ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:04 IST

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून २७ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एक हजार १०३ वाहने जप्त केली आहेत.

ठळक मुद्दे४८ लाख २३ हजारांचा दंड वसूल १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील अनेक भागांमध्ये कडक कारवाई केली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एक हजार १०३ वाहने जप्त केली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाख २३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून २७ ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त, नाका तपासणी आणि ग्रामीण भागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत गस्तही वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड आणि मीरा रोड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे या भागात नाके तपासणी मोठया प्रमाणावर केली जात आहे. २२ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान या सर्वच भागांमधून विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक विभाग तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. याच कारवाईमध्ये एक हजार ४३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून ४६ लाख पाच हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, विनाकारण रस्त्यावर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाºया ७२ आरोपींविरुद्ध १३ एप्रिल रोजी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची ६० वाहने एकाच दिवसात पोलिसांनी जप्त केली आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त विनाकारण फिरणा-या ५७५ वाहन चालकांवरही १३ एप्रिल रोजी मोटार वाहन कायद्याखाली कारवाई झाली. त्यांच्याकडूनही एकाच दिवसामध्ये दोन लाख १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. संचारबंदीचे पालन करावे. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत एक लाख १०३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून सुमारे ४८ लाखांचा दंड वसूल केला. शिवाय, अनेकांवर संचारबंदीच्या उल्लंघनाची कारवाई केली आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसArrestअटक