शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बिना रस्त्याची गावं! ठाणे जिल्ह्यात ११० गावांना रस्ते नसताना रुग्णवाहिका सेवा देण्याचे आदेश

By सुरेश लोखंडे | Updated: August 26, 2023 05:56 IST

प्रशासनाकडे नोंद मात्र महसुली गावांपैकी १६ गावांना रस्तेच नाहीत

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ११० आदिवासी, गावपाडे बारमाही रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, जिल्ह्यातील माता, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गरोदर महिला, माता, अर्भके यांना उपचारांसाठी घरापासून रुग्णालयापर्यंत आणि रुग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका देण्याचे आदेश राज्य शासनाने बुधवारी काढले. गावात जायला रस्ता नसताना रुग्णवाहिका घरापर्यंत कशा जाणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. उत्तम रुग्णवाहिका, त्यासाठी डिझेल, चालक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गावात रस्ते उपलब्ध नसताना या आदेशांची अंमलबजावणी करायची कशी, असा सवाल आरोग्य विभागातील अधिकारी करीत आहेत.शासनाच्या आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालकांनी वरील आदेश जारी केले. शासनाचे हे आदेश म्हणजे गरोदर महिला व लहानग्यांना जन्म दिलेल्या मातांची क्रूर थट्टा असल्याचे बोलले जात आहे.

१६ गावांना रस्ते नाहीत

ठाणे जिल्ह्यातील ८०७ महसूल गावांपैकी ७९१ गावे बारमाही रस्त्याने जोडल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. मात्र या महसुली गावांपैकी १६ गावांना रस्तेच नाहीत. काही घटनांमध्ये मातेसह बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना भिवंडीसह शहापूरच्या दुर्गम भागात घडल्या आहेत. अनेकदा या दुर्गम भागातील गरोदर महिलांना तालुक्याच्या ठिकाणीही धड उपचार मिळत नाहीत. मग त्यांना तसेच कळवा अथवा ठाणे सिव्हिल रुग्णालयाकडे पाठविले जाते.

जिल्ह्यातील जी गावे, पाडे रस्त्यांनी जोडली गेलेली नाहीत, त्या गावांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना ठाणे जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. त्यांचा अहवाल प्रात होताच राज्य शासनाने तरतूद केलेल्या निधीतून ही गाव-पाडे रस्त्यांनी जोडली जातील.- अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे

ठाणे जिल्ह्यात १,७०४ आदिवासी पाडे आहेत. यापैकी ७५ गावपाड्यांना बारमाही रस्ते नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या याेजनेतून या रस्त्यांची कामे हाती घेण्यास प्रस्तावित आहे. उर्वरित अनेक लहान पाडे वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्षे वसली आहेत; पण वन खात्याने त्यांना निवासी वस्तीचा दर्जा दिलेला नाही. हा दर्जा मिळवण्यासाठी वनखात्याकडे वर्षानुवर्षांपासून प्रस्ताव पडून आहेत. काही पाडे खासगी मालकीच्या जमिनीवर आहेत. तेथे जमीन मालकांकडून हरकत घेतली जाते. त्यामुळे वन विभाग व खासगी मालकांच्या विरोधामुळे या पाड्यांना वसाहतीचा दर्जा मिळत नाही व रस्त्यासारख्या सुविधाही पुरवता येत नाहीत. अधिकृत म्हणून नोंद घेता येत नसलेले अनेक आदिवासी पाडे ठाणे जिल्ह्यात आहेत.- बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ठाणे

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक