शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
7
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
8
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
9
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
11
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
12
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
13
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
14
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
15
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
16
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
17
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
18
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
19
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
20
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

By admin | Updated: December 24, 2015 01:35 IST

सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते

राजेश जाधव,  म्हारळसध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते. असंख्य वाहनांची रेलचेल, बांधकामे, रासायनिक कंपन्या अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. उघड्या माथ्याचे डोंगर आता भरू लागले आहेत. संरक्षित जंगले आता घनदाट होऊ लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे या भागात ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता आणि वन विभागाने ग्रामस्थांवरच जंगले वाचविण्यासाठी दिलेली जबाबदारी.कल्याण तालुक्यात जळवपास सहा हजार हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. त्यामध्ये वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वनविभागाने वृक्षलागवड केली तर ती झाडे ग्रामस्थांनी जगवायची, त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बनविल्या असून त्यामध्ये गावकऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात जवळपास १४ हजार गावे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे जंगलतोडीपासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थांना मदतरूपी गॅसवाटपही करण्यात येत आहे. तालुक्यातील जंगलात ६० ते ७० टक्के वाढ झाली असून यात साग, पाईन, बांबू आणि इतर वृक्षांचा समावेश आहे.आग लागल्यानंतर वणवा जास्त पसरू नये, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जाळरेषा तयार करून आता आटोक्यात आणण्याचा वन विभाग प्रयत्न करतो आहे. जंगल वाढण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड जवळपास ९० टक्के संपुष्टात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जळणाच्या फाट्यासाठी बैलगाडीसाठी आणि नांगरासाठी प्रामुख्याने जंगलतोड होत होती. पण, आता चुलीच्या ठिकाणी गॅस आल्याने फाट्यासाठी जंगल तोडणे बंद झाले आहे. बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडीचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. घरटी एक नांगर म्हणजे जवळपास ४ ते ५ झाडे नांगर बनविण्यासाठी शेतकऱ्यास लागत. आता मात्र त्या ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्याने त्याच्यासाठी होणारी जंगलतोडही थांबली आहे. त्याच्या परिणामामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवाई दिसू लागली आहे. हा पर्यावरणासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल.