शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

By admin | Updated: December 24, 2015 01:35 IST

सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते

राजेश जाधव,  म्हारळसध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते. असंख्य वाहनांची रेलचेल, बांधकामे, रासायनिक कंपन्या अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. उघड्या माथ्याचे डोंगर आता भरू लागले आहेत. संरक्षित जंगले आता घनदाट होऊ लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे या भागात ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता आणि वन विभागाने ग्रामस्थांवरच जंगले वाचविण्यासाठी दिलेली जबाबदारी.कल्याण तालुक्यात जळवपास सहा हजार हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. त्यामध्ये वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वनविभागाने वृक्षलागवड केली तर ती झाडे ग्रामस्थांनी जगवायची, त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बनविल्या असून त्यामध्ये गावकऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात जवळपास १४ हजार गावे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे जंगलतोडीपासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थांना मदतरूपी गॅसवाटपही करण्यात येत आहे. तालुक्यातील जंगलात ६० ते ७० टक्के वाढ झाली असून यात साग, पाईन, बांबू आणि इतर वृक्षांचा समावेश आहे.आग लागल्यानंतर वणवा जास्त पसरू नये, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जाळरेषा तयार करून आता आटोक्यात आणण्याचा वन विभाग प्रयत्न करतो आहे. जंगल वाढण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड जवळपास ९० टक्के संपुष्टात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जळणाच्या फाट्यासाठी बैलगाडीसाठी आणि नांगरासाठी प्रामुख्याने जंगलतोड होत होती. पण, आता चुलीच्या ठिकाणी गॅस आल्याने फाट्यासाठी जंगल तोडणे बंद झाले आहे. बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडीचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. घरटी एक नांगर म्हणजे जवळपास ४ ते ५ झाडे नांगर बनविण्यासाठी शेतकऱ्यास लागत. आता मात्र त्या ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्याने त्याच्यासाठी होणारी जंगलतोडही थांबली आहे. त्याच्या परिणामामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवाई दिसू लागली आहे. हा पर्यावरणासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल.