शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

By admin | Updated: December 24, 2015 01:35 IST

सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते

राजेश जाधव,  म्हारळसध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते. असंख्य वाहनांची रेलचेल, बांधकामे, रासायनिक कंपन्या अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. उघड्या माथ्याचे डोंगर आता भरू लागले आहेत. संरक्षित जंगले आता घनदाट होऊ लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे या भागात ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता आणि वन विभागाने ग्रामस्थांवरच जंगले वाचविण्यासाठी दिलेली जबाबदारी.कल्याण तालुक्यात जळवपास सहा हजार हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. त्यामध्ये वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वनविभागाने वृक्षलागवड केली तर ती झाडे ग्रामस्थांनी जगवायची, त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बनविल्या असून त्यामध्ये गावकऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात जवळपास १४ हजार गावे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे जंगलतोडीपासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थांना मदतरूपी गॅसवाटपही करण्यात येत आहे. तालुक्यातील जंगलात ६० ते ७० टक्के वाढ झाली असून यात साग, पाईन, बांबू आणि इतर वृक्षांचा समावेश आहे.आग लागल्यानंतर वणवा जास्त पसरू नये, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जाळरेषा तयार करून आता आटोक्यात आणण्याचा वन विभाग प्रयत्न करतो आहे. जंगल वाढण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड जवळपास ९० टक्के संपुष्टात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जळणाच्या फाट्यासाठी बैलगाडीसाठी आणि नांगरासाठी प्रामुख्याने जंगलतोड होत होती. पण, आता चुलीच्या ठिकाणी गॅस आल्याने फाट्यासाठी जंगल तोडणे बंद झाले आहे. बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडीचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. घरटी एक नांगर म्हणजे जवळपास ४ ते ५ झाडे नांगर बनविण्यासाठी शेतकऱ्यास लागत. आता मात्र त्या ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्याने त्याच्यासाठी होणारी जंगलतोडही थांबली आहे. त्याच्या परिणामामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवाई दिसू लागली आहे. हा पर्यावरणासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल.