शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खासदार, आमदारांना ग्रामस्थांनी विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 00:58 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या बेतात असताना आचारसंहितेपूर्वी शिवसेना-भाजपकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका केडीएमसी हद्दीत सुरू आहे.

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या बेतात असताना आचारसंहितेपूर्वी शिवसेना-भाजपकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका केडीएमसी हद्दीत सुरू आहे. रविवारी सागाव येथे रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भोपर गावच्या ग्रामस्थांनी गावात पाणी येत नसल्याच्या कारणावरून आमदार, खासदारांना जाब विचारला. तसेच, न्यायालयीन स्थगिती आदेश असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरूनही विरोध झाला.युनियन बँक ते रविकिरण सोसायटी या रस्त्याच्या भूमिपूजनाला सायंकाळी ५ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आले होते. त्यांच्यासोबत आ. सुभाष भोईर व शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे होते. हा रस्ता खाजगी जागेतून जात असून हिरामण म्हात्रे यांनी कल्याण दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्याने त्यावर स्थगिती आहे. न्यायालयाचे आदेश असताना या जागेतून रस्त्याचे काम कसे काय करता, असा सवाल हिरामण यांचा मुलगा जयेश म्हात्रे यांनी करीत हरकत घेतली. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. हा रस्ता आमदार भोईर यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार आहे. हा वाद सुरू असताना त्याठिकाणी भोपर गावातील ग्रामस्थ पोहचले. त्यांनी भोपर गावातील पाणीसमस्या कधी सोडविणार, असा जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांनी आमदारांच्या विरोधात आमदारांसमोरच खासदारांच्या उपस्थितीत नाराजी व्यक्त केली. त्याठिकाणची परिस्थिती पाहता खासदार, आमदार तेथून निघून गेले.काही दिवसांपूर्वीच वेदपाठशाळा व वृद्धाश्रम च्या कार्यक्रमावरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मनसे व शिवसेनेने पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार आणि आमदारांना ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येप्रकरणी जाब विचारला. तसेच ज्या रस्त्याचे भूमिपूजन आहे, त्या रस्त्याप्रकरणी न्यायालयीन स्थगिती आदेश आहे. यावरून शिवसेना-भाजपच्या विकासकामांची भूमिपूजने वादात सापडत असताना दिसून येत आहेत.>लवकरच बैठक घेऊ - शिंदेरस्त्याच्या जागेसंदर्भात जो विषय आहे त्यासंदर्भात बैठक घेऊन संबंधितांना मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे खासदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पण त्यांनी पाणी विषयावर भाष्य केले नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा