शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी

By सदानंद नाईक | Updated: April 5, 2023 15:08 IST

घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी अंटेलिया शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरील घाटाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला. म्हारळ, वरप व कांबा गावकऱ्यांनी घाटाचे नाव म्हसोबा ठेवण्याची मागणी केली असून या घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील संच्युरी कंपनी शेजारून बारमाही वाहणारी उल्हास नदी वाहत असून नागरिकांच्या सोयीसाठी रिजेन्सी व अंटेलिया येथे उल्हास नदीवर आमदार कुमार आयलानी यांनी आमदार निधीतून घाट बांधण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या घाटाला पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेऊनही घाटाचे काम सुरू आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते घाटाचे उदघाटन झाले असून घाट बनविण्यापूर्वी त्याठिकाणी म्हसोबा यांचे मंदिर असल्याने, घाटाला म्हसोबा घाट नाव द्या. अशी मागणी वरप, कांबा, म्हारळगावा मधील नागरिकांनी लावून धरली. त्यासाठी त्यांनी आमदार कुमार आयलानी यांची भेट घेतली. याप्रकारने अप्रत्यक्षपणे घाटाच्या नामांतरावरून गावकरी विरुद्ध आमदार असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली. 

दरम्यान उल्हास नदीवर एमआयडिसीने बंधारा बांधून नदी पात्रात विहीर खोदून पाणी पंपिंग स्टेशन उभे केले. नदी पात्रातील पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. पंपिंग स्टेशन शेजारीच शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळतो. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. अशी ओरड झाल्यावर महापालिकेने कोट्यावधी रुपयांची योजना राबवून नाल्यातील सांडपाणी अडवून व उचलून मलनिस्सारण केंद्रात नेऊन उल्हास खाडीत सोडले जाते. त्याच ठिकाणी मात्र थोडे पुढे आमदार आयलानी यांनी उल्हास नदी घाट बांधण्याचे काम सुरू केले. घाट पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला असून घाटासाठी नदी किनाऱ्यावरील झाडे, झुडपे तोडून किनारा सफाट केला. मात्र पावसाळ्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण न झाल्यास, नदीच्या पुराचे पाणी शेजारील परिसरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली. 

पर्यावरणवादी विरोधातउल्हास नदी पात्रातून पाणी उचलून शेजारील शहरांना एमआयडीसी पुरविले जाते, त्याच ठिकाणी घाट बांधण्यात येत असल्याने नदीचे प्रदूषण होऊन तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे राहणार असल्याचे भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर