शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी

By सदानंद नाईक | Updated: April 5, 2023 15:08 IST

घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी अंटेलिया शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरील घाटाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला. म्हारळ, वरप व कांबा गावकऱ्यांनी घाटाचे नाव म्हसोबा ठेवण्याची मागणी केली असून या घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील संच्युरी कंपनी शेजारून बारमाही वाहणारी उल्हास नदी वाहत असून नागरिकांच्या सोयीसाठी रिजेन्सी व अंटेलिया येथे उल्हास नदीवर आमदार कुमार आयलानी यांनी आमदार निधीतून घाट बांधण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या घाटाला पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेऊनही घाटाचे काम सुरू आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते घाटाचे उदघाटन झाले असून घाट बनविण्यापूर्वी त्याठिकाणी म्हसोबा यांचे मंदिर असल्याने, घाटाला म्हसोबा घाट नाव द्या. अशी मागणी वरप, कांबा, म्हारळगावा मधील नागरिकांनी लावून धरली. त्यासाठी त्यांनी आमदार कुमार आयलानी यांची भेट घेतली. याप्रकारने अप्रत्यक्षपणे घाटाच्या नामांतरावरून गावकरी विरुद्ध आमदार असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली. 

दरम्यान उल्हास नदीवर एमआयडिसीने बंधारा बांधून नदी पात्रात विहीर खोदून पाणी पंपिंग स्टेशन उभे केले. नदी पात्रातील पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. पंपिंग स्टेशन शेजारीच शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळतो. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. अशी ओरड झाल्यावर महापालिकेने कोट्यावधी रुपयांची योजना राबवून नाल्यातील सांडपाणी अडवून व उचलून मलनिस्सारण केंद्रात नेऊन उल्हास खाडीत सोडले जाते. त्याच ठिकाणी मात्र थोडे पुढे आमदार आयलानी यांनी उल्हास नदी घाट बांधण्याचे काम सुरू केले. घाट पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला असून घाटासाठी नदी किनाऱ्यावरील झाडे, झुडपे तोडून किनारा सफाट केला. मात्र पावसाळ्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण न झाल्यास, नदीच्या पुराचे पाणी शेजारील परिसरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली. 

पर्यावरणवादी विरोधातउल्हास नदी पात्रातून पाणी उचलून शेजारील शहरांना एमआयडीसी पुरविले जाते, त्याच ठिकाणी घाट बांधण्यात येत असल्याने नदीचे प्रदूषण होऊन तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे राहणार असल्याचे भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर