शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ग्रामस्थांची पाण्यासाठी होत आहे ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:59 IST

गंभीर परिस्थिती : ‘ठक्कर बाप्पां’तर्गत विहिरीचा फायदा कधी

जनार्दन भेरे।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : तालुक्यातील गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी असे अनेक गावपाडे असे आहेत, ज्यांची पाण्यासाठी फरफट आजही सुरू आहे. त्यापैकीच डोंगरवाडी, फणसवाडी, रिकामवाडी, करपटवाडी या गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगरवाडीपाड्यातील महिलांना तर एक दीड किमी अंतरावरील नदीतून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. या पाड्याच्या खाली विहीर असून या विहिरीतील पाण्याचा वापर ढाढरे, डोंगरवाडी आणि इतर पाड्यांतील लोक करत असतात. मात्र, यंदा या विहिरीतील पाणीच आटल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत तिचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर भरून किती पाणी पुरेल, ते पुढील वर्षी पाहायला मिळेल. सध्या या पाड्यात टँकरने पाणी मिळणे आवश्यक आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई अधिक व्यापक होत असून दिवसेंदिवस गावपाड्यांना पाणीपुरवठा करणे मोठे जोखमीचे ठरणार आहे. पाणीपुरवठा केला जात असलेल्या गावांची संख्या १९० वर पोहोचली आहे. तरी, आम्हालाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या गावपाड्यांची संख्या अधिक आहे. गेल्याच आठवड्यात काही गावपाड्यांनी मागणी करूनही त्यांना अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.या पाड्यात गंभीर पाणीटंचाई असून टँकरने पाणी पुरवण्याची नितांत गरज असल्याने टँकरने पाणी पुरवावे.- कमल भोईर, उपसरपंच

जेजे प्रस्ताव आमच्याकडे मंजुरीसाठी आले, तेते सर्व मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता