शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

विक्रमगडची राष्ट्रीय पेयजल योजना दोन वर्षांपासून बंद, ७३.४९ लाखांची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 01:28 IST

Vikramgad : वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली.

- संजय नेवे 

विक्रमगड : तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतींतर्गत पाटीलपाडा, कासपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, पासोडीपाडा, तळ्याचापाडा येथील जवळपास अडीच हजार लोकवस्तीकरिता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३ लाख ४९ हजार ३९० रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, ही योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद  असल्याने येथील जनतेला पाण्यासाठी अजूनही वणवण भटकावे लागत आहे.वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. यात योजनेतील अंदाजपत्रकात नवीन विहीर, पंपगृह, पंम्पिंग यंत्रसामग्री, ऊर्ध्ववाहिनी, उंच पाणी साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था व विद्युत जोडणी करणे अपेक्षित होते. या योजनेकरता  जलस्रोत बघून नवीन विहीर बांधकाम न करता  सन २००४-०५  जलस्वराज्य प्रकल्पामधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो.  २०१५ मध्ये कार्यादेश देण्यात आले होते; परंतु  सन २०१८ मध्ये हे काम  पूर्ण करण्यात आले. थोडेच दिवस येथील जनतेला पाणी मिळाले. नंतर ही पाणीपुरवठा योजना बंद पडून आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही गेली दोन वर्षे उलटून गेली तरीही येथील कासपाडा, पाटीलपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, तळ्याचापाडा या अडीच  हजार लोकवस्तीला  या योजनेतील नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत नाही. 

ही योजना विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. ग्रामपंचायतीला हा विषय सोडवण्यासाठी सूचित केले असून, काही पाडे हे जास्त अंतरावर आहेत. त्या पाड्यांकरिता त्यांच्या शेजारील विहिरीमधून मिनी नळ योजनेची अंमलबजावणी करून पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे.  - राजेश पाध्ये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, वाडा-विक्रमगड

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३.४९ लाख खर्च करूनसुद्धा येथील लोकांना पाणी मिळत नाही. या योजनेकरता जलस्रोत बघून नवीन विहीर बांधणे बंधनकारक असताना ठेकेदाराने २००४-०५ साली जलस्वराज्य प्रकल्प योजनेतून बांधलेल्या विहिरीत विद्युत पंप बसविले आहेत. हे पाणी लवकरच कमी होते. या योजनेकरता नवीन जलस्रोत बघून सर्व पाड्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी.  -विश्वनाथ गहला, ग्रामस्थ, वेहलपाडा ग्रामपंचायत 

टॅग्स :palgharपालघर