शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

विक्रमगडची राष्ट्रीय पेयजल योजना दोन वर्षांपासून बंद, ७३.४९ लाखांची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 01:28 IST

Vikramgad : वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली.

- संजय नेवे 

विक्रमगड : तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतींतर्गत पाटीलपाडा, कासपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, पासोडीपाडा, तळ्याचापाडा येथील जवळपास अडीच हजार लोकवस्तीकरिता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३ लाख ४९ हजार ३९० रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, ही योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद  असल्याने येथील जनतेला पाण्यासाठी अजूनही वणवण भटकावे लागत आहे.वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. यात योजनेतील अंदाजपत्रकात नवीन विहीर, पंपगृह, पंम्पिंग यंत्रसामग्री, ऊर्ध्ववाहिनी, उंच पाणी साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था व विद्युत जोडणी करणे अपेक्षित होते. या योजनेकरता  जलस्रोत बघून नवीन विहीर बांधकाम न करता  सन २००४-०५  जलस्वराज्य प्रकल्पामधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो.  २०१५ मध्ये कार्यादेश देण्यात आले होते; परंतु  सन २०१८ मध्ये हे काम  पूर्ण करण्यात आले. थोडेच दिवस येथील जनतेला पाणी मिळाले. नंतर ही पाणीपुरवठा योजना बंद पडून आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही गेली दोन वर्षे उलटून गेली तरीही येथील कासपाडा, पाटीलपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, तळ्याचापाडा या अडीच  हजार लोकवस्तीला  या योजनेतील नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत नाही. 

ही योजना विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. ग्रामपंचायतीला हा विषय सोडवण्यासाठी सूचित केले असून, काही पाडे हे जास्त अंतरावर आहेत. त्या पाड्यांकरिता त्यांच्या शेजारील विहिरीमधून मिनी नळ योजनेची अंमलबजावणी करून पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे.  - राजेश पाध्ये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, वाडा-विक्रमगड

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३.४९ लाख खर्च करूनसुद्धा येथील लोकांना पाणी मिळत नाही. या योजनेकरता जलस्रोत बघून नवीन विहीर बांधणे बंधनकारक असताना ठेकेदाराने २००४-०५ साली जलस्वराज्य प्रकल्प योजनेतून बांधलेल्या विहिरीत विद्युत पंप बसविले आहेत. हे पाणी लवकरच कमी होते. या योजनेकरता नवीन जलस्रोत बघून सर्व पाड्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी.  -विश्वनाथ गहला, ग्रामस्थ, वेहलपाडा ग्रामपंचायत 

टॅग्स :palgharपालघर